मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
'नुक्कड, वागले की दुनिया' या मालिका व 'जाने भी दो यारो...', 'कभी हा कभी ना'सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक व लेखक कुंदन शहा यांचं आज मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. शुक्रवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शहा यांच्या निधनाबद्दल बॉलिवूडमधील मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.
हलक्याफुलक्या, नर्मविनोदी चित्रपटांबद्दल कुंदन शहा ओळखले जायचे. आपल्या कलाकृतीतून सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. 'जाने भी दो यारो...' या त्यांच्या उपरोधिक शैलीतील चित्रपटामुळं त्यांचं नाव घराघरात गेलं. हा चित्रपट इतका गाजला की कुंदन शहा हे नाव त्यासोबत कायमचं जोडलं गेलं. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. 'जाने भी दो यारो...' बरोबरच शहा यांनी 'कभी हा कभी ना...', 'खामोश, हम तो मोहब्बत करेगा, पी से पीएम तक, क्या कहना, एक से बढकर एक या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटांबरोबरच त्यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला होता. दूरदर्शनवरील 'नुक्कड' व 'वागले की दुनिया' या त्यांच्या मालिकाही प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या.
कुंदन शहा हे संवेदनशील स्वभावाचे होते. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल ते प्रचंड सजग होते. देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या विरोधातही त्यांनी आवाज उठवला होता. सरकारच्या निष्क्रियतेच्या विरोधात त्यांनी आपला राष्ट्रीय पुरस्कारही परत केला होता.
कुशल कथाकार हरपला!
कुंदन शाह यांच्या रूपानं बॉलिवूडनं एक कुशल कथाकार गमावला आहे, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे. शहा यांनी बनविलेल्या महान चित्रपटांमुळं त्यांचं नाव भारतीय सिनेमाच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं आहे. त्यांच्या चित्रपटांच्या रूपानं ते कायम आमच्यासोबत राहतील, अशा शब्दांत दिग्दर्शक सुभाष घई यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. शहा यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चा संप्रदाय निर्माण केला होता, अशी भावना करण जोहरनं व्यक्त केली आहे. तर, शहा हा एक धाडसी माणूस होता. 'जाने भी दो...'सारख्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी समांतर सिनेमाला एक ताकद दिली होती, असं दिग्दर्शक महेश भट्ट यांनी म्हटलं आहे.
'नुक्कड, वागले की दुनिया' या मालिका व 'जाने भी दो यारो...', 'कभी हा कभी ना'सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक व लेखक कुंदन शहा यांचं आज मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. शुक्रवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शहा यांच्या निधनाबद्दल बॉलिवूडमधील मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.
हलक्याफुलक्या, नर्मविनोदी चित्रपटांबद्दल कुंदन शहा ओळखले जायचे. आपल्या कलाकृतीतून सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. 'जाने भी दो यारो...' या त्यांच्या उपरोधिक शैलीतील चित्रपटामुळं त्यांचं नाव घराघरात गेलं. हा चित्रपट इतका गाजला की कुंदन शहा हे नाव त्यासोबत कायमचं जोडलं गेलं. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. 'जाने भी दो यारो...' बरोबरच शहा यांनी 'कभी हा कभी ना...', 'खामोश, हम तो मोहब्बत करेगा, पी से पीएम तक, क्या कहना, एक से बढकर एक या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटांबरोबरच त्यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला होता. दूरदर्शनवरील 'नुक्कड' व 'वागले की दुनिया' या त्यांच्या मालिकाही प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या.
कुंदन शहा हे संवेदनशील स्वभावाचे होते. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल ते प्रचंड सजग होते. देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या विरोधातही त्यांनी आवाज उठवला होता. सरकारच्या निष्क्रियतेच्या विरोधात त्यांनी आपला राष्ट्रीय पुरस्कारही परत केला होता.
कुशल कथाकार हरपला!
कुंदन शाह यांच्या रूपानं बॉलिवूडनं एक कुशल कथाकार गमावला आहे, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे. शहा यांनी बनविलेल्या महान चित्रपटांमुळं त्यांचं नाव भारतीय सिनेमाच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं आहे. त्यांच्या चित्रपटांच्या रूपानं ते कायम आमच्यासोबत राहतील, अशा शब्दांत दिग्दर्शक सुभाष घई यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. शहा यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चा संप्रदाय निर्माण केला होता, अशी भावना करण जोहरनं व्यक्त केली आहे. तर, शहा हा एक धाडसी माणूस होता. 'जाने भी दो...'सारख्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी समांतर सिनेमाला एक ताकद दिली होती, असं दिग्दर्शक महेश भट्ट यांनी म्हटलं आहे.