अ‍ॅपशहर

Bacchu Kadu: मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडूंचा 'प्रहार', 'मंत्रीपद आमचे हक्काचे आहे आणि ते आम्ही मिळवूच'

Maharashtra Cabinet Expansion : मुंबईत आज राजभवनात शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. जवळपास १८ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जातं. हा छोट्या स्वरुपाचा पहिल्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार असल्याचं बोललं जातंय. यामुळे आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर मंत्रिमंडळात अपक्ष आमदारांनाही स्थान देण्यात आलेलं नाहीए. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना सुरू आहेत. यावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2022, 11:28 am
मुंबई : मुंबईत राजभवनात मंत्रिमंडळ विस्ताराच्या ( Maharashtra Cabinet Expansion News ) हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांची आमदारांसोबत बैठक सुरू आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेते उपस्थित होत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे हे बंगल्यावर दाखल झाले. भाजपचे ९ आमदार आणि शिंदे गटातील ९ आमदार अशा एकूण १८ मंत्र्यांचा शपथविधी होणार, असं सांगण्यात येत आहे. मात्र यात अपक्ष आमदारांचा समावेश नाही. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर अपक्ष आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Bacchu Kadu mla
'मंत्रीपद आमचे हक्काचे आहे आणि ते आम्ही मिळवूच', बच्चू कडूंचा 'प्रहार'


अपंग मंत्रालय, दिव्यांग कल्याण मंत्रालय वेगळं करता येईल. किमान रोजगार हमी योजना ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांसाठी उपयोगी करता येईल का? असे मुद्दे आपण उपस्थित केले आहेत. फार महत्त्वाचे निर्णय सरकारने केले पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही राहू. मंत्रीपद हे आमचे हक्काचे आहे आणि ते आम्ही मिळवूच. त्याबद्दल शंका नाही. ते भटणार. जे सामान्यांशी निगडीत विषय आहेत, त्यासाठी आम्ही आग्रही राहू, असं माजी मंत्री आणि अपक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले. हे सरकार मित्रपक्ष आणि अपक्षांशिवाय राहू शकत नाही. कारण ही मोठी संख्या त्यांची आहे. यांचा विचार व्हावा, अशी अपेक्ष आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

Ajit Pawar मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, नाराजी दूर करण्यासाठी...

मंत्री कधी होणार?, बच्चू कडूंनी दिले उत्तर

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला आहे. आगामी काळात जेव्हा विस्तार होईल. त्यावेळी अपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल. हा आमचा शब्द आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. आता काही तांत्रिक कारण असेल. यामुळे आता आम्ही दोन पावलं मागे घेऊ. काही गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात. त्या आम्हीही सांभाळू. एकत्रित राहण्याच्या निर्णय घेतल्यावर काही पावंल मागे घेणं, काही पावलं पुढे जाणं, कधी मोठेपणा दाखवणं, कधी त्याग करणं या गोष्टी राजकारणात केल्याशिवाय राजकारण बळकट होत नाही. यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिलेल्या शब्दावर ते ठाम राहतील, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

LIVE मंत्रिमंडळ विस्तार, १८ जण घेणार शपथ; नावं उघड... कोण कोण आहे पाहा...

महत्वाचे लेख