मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपुढं मांडताना अचानक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यावर घसरलेले व त्याची कबुतराशी तुलना करणारे आमदार बच्चू कडू यांनी आता या प्रकरणी सारवासारव केली आहे. 'सचिन तेंडुलकर याच्या धावांबाबत मी केलेलं वक्तव्य शेतकऱ्यांच्या समस्यांच्या अनुषंगानं होतं. त्यामागे सचिनला अपमानित करण्याचा हेतू नव्हता. माझ्याकडून तसं होणारही नाही,' असं स्पष्टीकरण कडू यांनी दिलं आहे.
शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात संताप व्यक्त करताना बच्चू कडू हे काल सचिनवर घसरले होते. 'सचिन तेंडुलकरचे रन मोजणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहेत. पण या बांधापासून त्या बांधापर्यंत आयुष्यभर पायपीट करणाऱ्या माऊलीचे, शेतकऱ्यांचे रन मोजायला कुणीच नाही, याचं दुःख आहे. सचिन तेंडुलकरचे रन मोजू नका. ते कबुतर मेलं काय, राहिलं काय', अशा अत्यंत कडवट्ट शब्दांत बच्चू कडू यांनी राग व्यक्त केला होता. 'इथून चौका आणि तिथून छक्का कुणालाही मारता येईल. पण याला एवढं डोक्यावर घेतलंय, असं वाटतंय की पाकिस्तान जिंकून आलंय', असंही हे म्हणाले होते.
बच्चू यांच्या या 'कडू' वाणीवर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली होती. या टीकेमुळं बॅकफूटवर गेलेल्या कडू यांनी यावर खुलासा केला आहे. 'शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना मांडण्याच्या अनुषंगानं मी ते वक्तव्य केलं होतं. सचिनचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता,' असं त्यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपुढं मांडताना अचानक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यावर घसरलेले व त्याची कबुतराशी तुलना करणारे आमदार बच्चू कडू यांनी आता या प्रकरणी सारवासारव केली आहे. 'सचिन तेंडुलकर याच्या धावांबाबत मी केलेलं वक्तव्य शेतकऱ्यांच्या समस्यांच्या अनुषंगानं होतं. त्यामागे सचिनला अपमानित करण्याचा हेतू नव्हता. माझ्याकडून तसं होणारही नाही,' असं स्पष्टीकरण कडू यांनी दिलं आहे.
शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात संताप व्यक्त करताना बच्चू कडू हे काल सचिनवर घसरले होते. 'सचिन तेंडुलकरचे रन मोजणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहेत. पण या बांधापासून त्या बांधापर्यंत आयुष्यभर पायपीट करणाऱ्या माऊलीचे, शेतकऱ्यांचे रन मोजायला कुणीच नाही, याचं दुःख आहे. सचिन तेंडुलकरचे रन मोजू नका. ते कबुतर मेलं काय, राहिलं काय', अशा अत्यंत कडवट्ट शब्दांत बच्चू कडू यांनी राग व्यक्त केला होता. 'इथून चौका आणि तिथून छक्का कुणालाही मारता येईल. पण याला एवढं डोक्यावर घेतलंय, असं वाटतंय की पाकिस्तान जिंकून आलंय', असंही हे म्हणाले होते.
बच्चू यांच्या या 'कडू' वाणीवर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली होती. या टीकेमुळं बॅकफूटवर गेलेल्या कडू यांनी यावर खुलासा केला आहे. 'शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना मांडण्याच्या अनुषंगानं मी ते वक्तव्य केलं होतं. सचिनचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता,' असं त्यांनी म्हटलं आहे.