म. टा. वृत्तसेवा, वसई
दहीहंडी उत्सवांमधील जोखीम व धोका विचारात घेऊन त्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी पालिकेने गोविंदांना मोफत विमा देण्यास ठरवले आहे; परंतु पालिकेने याबाबत आवाहन केल्यानंतर आतापर्यंत फक्त १६ गोविंदा पथकांनी म्हणजेच यात १ हजार २९८ गोविंदांना आपली नोंदणी केली. गेल्या वर्षी ४ हजार ८१९ गोविंदांनी नोंद केली होती. त्यामुळे या योजनेस गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदादेखील विविध गणेशोत्सव मंडळे, गोविंदा पथके दहीहंडी साजरी करण्यासाठी सज्ज झाली आहेत. उंचावरील मनाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चढाओढ लागते. ही चढाओढ २४ ऑगस्ट रोजी वसई-विरारमध्ये अनुभवता येणार आहे. दरवर्षी उंचावरील हंड्या फोडताना गोविंदांना होणारे अपघात पाहता यंदाही गोविंदा पथकांसाठी वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाने खास विमा योजनेस मंजुरी दिली. त्यानुसार पालिकेने वसई-विरारमधील गोविंदा पथकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आठ ऑगस्टपासून सुरवात करण्यात आली, तर २२ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. २० ऑगस्टपर्यंत १६ गोविंदा पथकांनी आपली नोंदणी पालिकेकडे केली. यामध्ये १ हजार २९८ गोविंदांचा समावेश असल्याची माहिती पालिकेने दिली.
योजनेचे स्वरूप
वसई-विरार महापालिकेतर्फे शहरातील नोंदणीकृत गोविंदा पथकांचा विमा नोंद केला जात आहे. यात अपघाती मृत्यू झाल्यास प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला १० लाख, तर दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास १० लाख रुपये, तसेच एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास ५ लाख, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख या विम्यातून देण्यात येणार आहेत. अपघातामुळे होणारा रुग्णालयाचा एक लाखापर्यंतचा खर्च संबंधित विमा कंपनीतर्फे देण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले. वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षी नोंदणीकृत ४ हजार ८१९ गोविंदांनी विम्याची नोंद केली होती; परंतु यावर्षी फक्त १ हजार २९८ गोविंदांच्या विम्याची नोंद झाल्याने हा अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे. शहरातील गोविंदांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
दहीहंडी उत्सवांमधील जोखीम व धोका विचारात घेऊन त्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी पालिकेने गोविंदांना मोफत विमा देण्यास ठरवले आहे; परंतु पालिकेने याबाबत आवाहन केल्यानंतर आतापर्यंत फक्त १६ गोविंदा पथकांनी म्हणजेच यात १ हजार २९८ गोविंदांना आपली नोंदणी केली. गेल्या वर्षी ४ हजार ८१९ गोविंदांनी नोंद केली होती. त्यामुळे या योजनेस गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदादेखील विविध गणेशोत्सव मंडळे, गोविंदा पथके दहीहंडी साजरी करण्यासाठी सज्ज झाली आहेत. उंचावरील मनाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चढाओढ लागते. ही चढाओढ २४ ऑगस्ट रोजी वसई-विरारमध्ये अनुभवता येणार आहे. दरवर्षी उंचावरील हंड्या फोडताना गोविंदांना होणारे अपघात पाहता यंदाही गोविंदा पथकांसाठी वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाने खास विमा योजनेस मंजुरी दिली. त्यानुसार पालिकेने वसई-विरारमधील गोविंदा पथकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आठ ऑगस्टपासून सुरवात करण्यात आली, तर २२ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. २० ऑगस्टपर्यंत १६ गोविंदा पथकांनी आपली नोंदणी पालिकेकडे केली. यामध्ये १ हजार २९८ गोविंदांचा समावेश असल्याची माहिती पालिकेने दिली.
योजनेचे स्वरूप
वसई-विरार महापालिकेतर्फे शहरातील नोंदणीकृत गोविंदा पथकांचा विमा नोंद केला जात आहे. यात अपघाती मृत्यू झाल्यास प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला १० लाख, तर दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास १० लाख रुपये, तसेच एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास ५ लाख, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख या विम्यातून देण्यात येणार आहेत. अपघातामुळे होणारा रुग्णालयाचा एक लाखापर्यंतचा खर्च संबंधित विमा कंपनीतर्फे देण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले. वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षी नोंदणीकृत ४ हजार ८१९ गोविंदांनी विम्याची नोंद केली होती; परंतु यावर्षी फक्त १ हजार २९८ गोविंदांच्या विम्याची नोंद झाल्याने हा अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे. शहरातील गोविंदांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.