अ‍ॅपशहर

‘सामना’वर बंदीची भाजपची मागणी

मतदानाच्या आधीचे दोन दिवस नियमानुसार प्रचार थांबल्यानंतर मतदारांना प्रभावित करणारा मजकूर प्रकाशित करणे किंवा जाहिरात मोहीम हाती घेण्यावर बंदी असतानाही ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी केला आहे.

Maharashtra Times 16 Feb 2017, 1:30 am
मुंबई : मतदानाच्या आधीचे दोन दिवस नियमानुसार प्रचार थांबल्यानंतर मतदारांना प्रभावित करणारा मजकूर प्रकाशित करणे किंवा जाहिरात मोहीम हाती घेण्यावर बंदी असतानाही ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी केला आहे. त्यामुळे १६, २० व २१ फेब्रुवारीला ‘सामना’ प्रसिद्ध करण्यावरच बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ban on samana
‘सामना’वर बंदीची भाजपची मागणी


आयोगाने आखून दिलेल्या नियमांचे ‘सामना’च्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये उघडपणे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला असून, त्यासाठी ‘सामना’ आणि त्याच्या संपादकांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज