म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
गिरणी कामगारांसह श्रमिकांची कर्मभूमी असलेल्या गिरणगावातील सुमारे ९५ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळी आता इतिहासजमा होणार आहेत! डिलाईल रोड, वरळी, नायगाव आणि शिवडी येथे २०७ बीडीडी चाळी असून यातल्या डिलाईल रोड, वरळी, नायगाव येथील १९४ चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २२ एप्रिलला होत आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी अवघ्या अडीच वर्षांत मार्गी लावले असून जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. १६० चौ. फूटांच्या खोलीत राहणाऱ्या बीडीडी चाळकऱ्यांना ५०० चौ. फूटांची सदनिका मोफत मिळणार आहे.
डिलाईल रोड, नायगाव, वरळी आणि शिवडी हा परिसर गिरणगाव म्हणून ओळखला जात होता. या गिरण्यांच्या जमिनीवर टोलेजंग इमारती उम्या राहिल्या आहेत. परंतु या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळीत बहुतांश गिरणी कामगार आणि त्यांची कुटुंबं राहतात. श्रमिकांची वसाहत असलेल्या बीडीडी चाळी जुन्या व जीर्ण अवस्थेत आहेत. आतापर्यंत अनेक सरकारांनी चाळींच्या पुनर्विकासाच्या केवळ घोषणा केल्या. प्रत्यक्षात बीडीडी चाळकरी १६० चौ. फूटांच्या खोलीत दयनीय अवस्थेत राहत होते. डिलाईल रोड, वरळी, नायगाव आणि शिवडी येथे ९२ एकर जागेवर या २०७ चाळी वसल्या आहेत. यातल्या वरळी, नायगाव आणि डिलाईल रोड येथील १९५ चाळींचा पुनर्विकास होत आहे. शिवडी येथील बीडीडी चाळी या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असल्याने त्यांच्या पुनर्विकासाबाबत प्रक्रिया सुरू आहे.
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबतचे आतापर्यंत सरकार दरबारी अनेक अहवाल झाले. प्रत्यक्षात या चाळींच्या पुनर्विकासाला गती आली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांनी त्यानंतर या प्रकल्पाला गती देण्यात महत्त्वाची भूमिका वठविली. पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडाला नोडल एजन्सी म्हणून नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रिटिश डेव्हलमेंट डिपार्टमेंट असे बीडीडी चाळीच्या जमिनीचे मालक होते. त्यामुळे आता जमिनीचे भोगवटादार म्हणून म्हाडाचे नाव लावण्यात आले आहे. विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्यात आले. डिलाईल रोड आणि नायगाव बीडीडीच्या पुनर्विकासासाठी जागतिक निविदा काढण्यात आल्या असून डिलाईल रोड येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम शापूरजी अॅन्ड पालोनजी या कंपनीला तर नायगांव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम एल अॅन्ड टी या कंपनीला देण्यात आले आहे. वरळी प्रकल्पाची निविदा काढण्यात आली असून लवकरच तेथे बांधकाम करणारी ठेकेदार कंपनी जाहीर केली जाईल.
डिलाईल रोड येथे चाळकऱ्यांसाठी २३ मजली इमारती बांधण्यात येतील तर विक्रीसाठी ६० मजल्यांच्या इमारती बांधण्याचे प्रस्तावित आहे. चाळकऱ्यांना टप्प्याटप्प्याने संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येणार आहे. डिलाईल रोड आणि नायगाव येथील पुनर्विकासाचा प्रकल्प सात वर्षांत पूर्ण होणार आहे.
बीडीडीतील १६ हजार २०३ चाळकऱ्यांना ५०० चौ. फूट कार्पेट क्षेत्रफळाची सदनिका मोफत देण्यात येणार आहे. तसेच बीडीडी चाळकऱ्यांसाठी घरे बांधल्यानंतर उर्वरित जागेवर म्हाडासाठी परवडणारी घरे बांधण्यात येतील.
बीडीडी चाळींचा इतिहास....
ब्रिटिश राजवटीत मुंबईतील गिरण्यांच्या भागात कामगारांसाठी १९१९ मध्ये खोल्या बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. १९२३ मध्ये बीडीडी चाळीतील खोल्या कामगारांना राहण्यासाठी देण्यात आल्या. नायगाव येथे ४२, डिलाईल रोड ३२, वरळी १२१, शिवडी १३ अशा २०७ चाळी बांधण्यात आल्या. तेव्हा वरळीच्या चाळीत ६ रुपये, शिवडीत सात रुपये, नायगाव येथे ८ रुपये तर डिलाईल रोडला ८ रुपये या खोल्यांचे भाडे होते. या चाळींमध्ये बहुतांश कापड गिरण्यांमधील कामगार राहत होते. किती भाडेकरू राहतात, त्यांच्याकडून किती भाडे जमा होते, याबाबतचा लेखाजोखा ब्रिटिश सरकार ठेवत असे. या चाळींमधील खोल्या या कामगारांच्या मालकीच्या नव्हत्या. चाळींच्या देखभालीसाठी नंतर बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची स्थापना करण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर या चाळींच्या देखभालीची व्यवस्था ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली. आतापर्यत हाच विभाग या चाळींची देखभाल करत आहे.
गिरणी कामगारांसह श्रमिकांची कर्मभूमी असलेल्या गिरणगावातील सुमारे ९५ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळी आता इतिहासजमा होणार आहेत! डिलाईल रोड, वरळी, नायगाव आणि शिवडी येथे २०७ बीडीडी चाळी असून यातल्या डिलाईल रोड, वरळी, नायगाव येथील १९४ चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २२ एप्रिलला होत आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी अवघ्या अडीच वर्षांत मार्गी लावले असून जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. १६० चौ. फूटांच्या खोलीत राहणाऱ्या बीडीडी चाळकऱ्यांना ५०० चौ. फूटांची सदनिका मोफत मिळणार आहे.
डिलाईल रोड, नायगाव, वरळी आणि शिवडी हा परिसर गिरणगाव म्हणून ओळखला जात होता. या गिरण्यांच्या जमिनीवर टोलेजंग इमारती उम्या राहिल्या आहेत. परंतु या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळीत बहुतांश गिरणी कामगार आणि त्यांची कुटुंबं राहतात. श्रमिकांची वसाहत असलेल्या बीडीडी चाळी जुन्या व जीर्ण अवस्थेत आहेत. आतापर्यंत अनेक सरकारांनी चाळींच्या पुनर्विकासाच्या केवळ घोषणा केल्या. प्रत्यक्षात बीडीडी चाळकरी १६० चौ. फूटांच्या खोलीत दयनीय अवस्थेत राहत होते. डिलाईल रोड, वरळी, नायगाव आणि शिवडी येथे ९२ एकर जागेवर या २०७ चाळी वसल्या आहेत. यातल्या वरळी, नायगाव आणि डिलाईल रोड येथील १९५ चाळींचा पुनर्विकास होत आहे. शिवडी येथील बीडीडी चाळी या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असल्याने त्यांच्या पुनर्विकासाबाबत प्रक्रिया सुरू आहे.
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबतचे आतापर्यंत सरकार दरबारी अनेक अहवाल झाले. प्रत्यक्षात या चाळींच्या पुनर्विकासाला गती आली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांनी त्यानंतर या प्रकल्पाला गती देण्यात महत्त्वाची भूमिका वठविली. पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडाला नोडल एजन्सी म्हणून नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रिटिश डेव्हलमेंट डिपार्टमेंट असे बीडीडी चाळीच्या जमिनीचे मालक होते. त्यामुळे आता जमिनीचे भोगवटादार म्हणून म्हाडाचे नाव लावण्यात आले आहे. विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्यात आले. डिलाईल रोड आणि नायगाव बीडीडीच्या पुनर्विकासासाठी जागतिक निविदा काढण्यात आल्या असून डिलाईल रोड येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम शापूरजी अॅन्ड पालोनजी या कंपनीला तर नायगांव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम एल अॅन्ड टी या कंपनीला देण्यात आले आहे. वरळी प्रकल्पाची निविदा काढण्यात आली असून लवकरच तेथे बांधकाम करणारी ठेकेदार कंपनी जाहीर केली जाईल.
डिलाईल रोड येथे चाळकऱ्यांसाठी २३ मजली इमारती बांधण्यात येतील तर विक्रीसाठी ६० मजल्यांच्या इमारती बांधण्याचे प्रस्तावित आहे. चाळकऱ्यांना टप्प्याटप्प्याने संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येणार आहे. डिलाईल रोड आणि नायगाव येथील पुनर्विकासाचा प्रकल्प सात वर्षांत पूर्ण होणार आहे.
बीडीडीतील १६ हजार २०३ चाळकऱ्यांना ५०० चौ. फूट कार्पेट क्षेत्रफळाची सदनिका मोफत देण्यात येणार आहे. तसेच बीडीडी चाळकऱ्यांसाठी घरे बांधल्यानंतर उर्वरित जागेवर म्हाडासाठी परवडणारी घरे बांधण्यात येतील.
बीडीडी चाळींचा इतिहास....
ब्रिटिश राजवटीत मुंबईतील गिरण्यांच्या भागात कामगारांसाठी १९१९ मध्ये खोल्या बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. १९२३ मध्ये बीडीडी चाळीतील खोल्या कामगारांना राहण्यासाठी देण्यात आल्या. नायगाव येथे ४२, डिलाईल रोड ३२, वरळी १२१, शिवडी १३ अशा २०७ चाळी बांधण्यात आल्या. तेव्हा वरळीच्या चाळीत ६ रुपये, शिवडीत सात रुपये, नायगाव येथे ८ रुपये तर डिलाईल रोडला ८ रुपये या खोल्यांचे भाडे होते. या चाळींमध्ये बहुतांश कापड गिरण्यांमधील कामगार राहत होते. किती भाडेकरू राहतात, त्यांच्याकडून किती भाडे जमा होते, याबाबतचा लेखाजोखा ब्रिटिश सरकार ठेवत असे. या चाळींमधील खोल्या या कामगारांच्या मालकीच्या नव्हत्या. चाळींच्या देखभालीसाठी नंतर बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची स्थापना करण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर या चाळींच्या देखभालीची व्यवस्था ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली. आतापर्यत हाच विभाग या चाळींची देखभाल करत आहे.