अ‍ॅपशहर

जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी अखेर राष्ट्रवादीचं घड्याळ हातातून उतरवलं आणि शिवसेनेचं शिवबंधन बांधलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2022, 8:20 pm
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील दिग्गज नेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी अखेर राष्ट्रवादीचं घड्याळ हातातून उतरवलं आणि शिवसेनेचं शिवबंधन बांधलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jaydutt kshirsagar
जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश


जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशाने बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. क्षीरसागर यांच्या सेनाप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'क्षीरसागर यांचं शिवसेनेत स्वागत आहे. शिवसेनेचा परिवार वाढतोय, ताकद वाढतेय. एक्झिट पोल आणि क्षीरसागर यांच्या सेना प्रवेशाचा संबंध नाही, हे लक्षात घ्यावे. क्षीरसागर, शिवसेनेत येण्याचा आपल्याला कधीही पश्चातातप होणार नाही. तुम्हाला शिवसेना वाढवायची आहे, ती अधिक बळकट करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. बीड जिल्हा तर मजबूत करायचाच आहे, पण उद्याच्या महाराष्ट्राचं जे स्वप्न शिवसेना पाहतेय ते साकार करण्यासाठीही तुमच्या प्रयत्नांची पक्षाला आवश्यकता आहे.'

जयदत्त क्षीरसागर आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले, 'एक्झिट पोलमुळे मी हा निर्णय घेतलेला नाही. माझा निर्णय खूप आधीच झाला होता. राज्यात युतीच्या उमेदवाराचं मी जाहीर समर्थन केलं. ज्या पक्षाच्या स्थापनेपासून मी त्यात आहे, जो मी ताकदीनं वाढवला. बीड जिल्ह्यात सहा-सहा आमदार दिले. असं असतानाही राष्ट्रवादीनं दिलेल्या वागणुकीमुळं माझी, माझ्या कार्यकर्त्यांची सातत्याने घुसमट होत गेली.'



खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. यापूर्वी जयदत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र गेल्या महिन्यात क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन ही शक्यता फेटाळून लावली होती. आज त्यांच्या सेनाप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.

'निकालाबद्दल आता काही बोलणार नाही'


उद्या २३ मे रोजी असलेल्या लोकसभा निकालांबाबत पत्रकारांनी ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, 'निकाल काही तासांवर आले आहेत, तेव्हा मी आता निकालाबद्दल काहीच बोलणार नाही.' ईव्हीएमबाबत सुरू असलेल्या संभ्रमाबाबत विचारले असता ठाकरे यांनी विरोधी पक्षांना टोला लगावला. ते म्हणाले, 'एक्झिट पोलचे अंदाज तर सर्वांना माहित आहेत. ते तर ईव्हीएमच्या माध्यमातून घेतले गेलेले नाहीत ना, मग त्यावर तरी विश्वास ठेवा.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज