मुंबई : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरूआहेत. मात्र, या स्थितीचा गैरफायदा घेऊन, आम्ही पंतप्रधान वा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे संकलित करणारे अधिकृत व्यक्ती अथवा संस्था आहोत, असे सांगणे व भासवणे हे बेकायदेशीर कृत्य आहे. यामुळे अशा तोतया व्यक्तींकडून सामान्य नागरिकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. सरकारसाठी निधी संकलन करायचा असल्यास मुंबई विश्वस्त व्यवस्था कायद्याचे कलम ४१ क नुसार धर्मादाय आयुक्तांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीविना अशा व्यक्ती किंवा अनधिकृत संस्थांविरुद्ध (अनोंदणीकृत) चौकशीअंती फौजदारी कारवाई होऊ शकते. तसेच, नागरिकांनी देखील देणगी देताना काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
तोतया व्यक्तींपासून सावध राहा!
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरूआहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Apr 2020, 4:00 am