अ‍ॅपशहर

कोरेगाव-भीमा: आनंद तेलतुंबडेंना हंगामी जामीन नाकारला

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी प्रा. आनंद तेलतुंबडे यांना विशेष एनआयए कोर्टानं हंगामी जामीन नाकारला असून, त्यांची ८ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2020, 4:45 pm
मुंबई: कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप झालेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतील विशेष एनआयए कोर्टानं हंगामी जामीन नाकारला आहे. त्यांची ८ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Anand Teltumbde


सुप्रीम कोर्टानं प्रा. आनंद तेलतुंबडे यांना तुरूंग प्रशासनासमोर शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यामुळं तेलतुंबडे हे १४ एप्रिल रोजी एनआयएच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तेलतुंबडे यांना विशेष एनआयए कोर्टासमोर आज हजर करण्यात आले. त्यांना ८ मे रोजीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. श्वसनाचा त्रास होत असल्यानं हंगामी जामीन मिळावा, अशी विनंती तेलतुंबडे यांनी अर्जाद्वारे केली होती. मात्र, कोर्टानं त्यांची विनंती धुडकावून हंगामी जामीन नाकारला. दरम्यान, तेलतुंबडे यांना वैद्यकीय उपचार पुरवण्याबाबत कोर्टानं तुरुंग प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. उद्या त्यासंदर्भात सुनावणी होणार आहे.

तेलतुंबडे, नवलखा यांची एनआयएसमोर शरणागती

तेलतुंबडेंच्या माध्यमातून आंबेडकर कुटुंब लक्ष्य

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज