म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
उष्मा वाढल्यामुळे भाज्यांचे पीक अमाप आले आहे. घाऊक बाजारामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या भाज्यांचे प्रमाणही वाढले आहे. मुंबईतील घाऊक बाजारासह नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेतही भाज्यांच्या किमती साफ कोसळल्या आहेत. किरकोळ विक्रेते खरेदी करायला येताना ज्या किमतीला भाज्या मागतात, त्या किमतीला देण्याची तयारीही घाऊक विक्रेत्यांची आहे. अशी परिस्थिती असतानाही मुंबईतील बाजारांत मात्र भाज्यांचे भाव चढेच आहेत. घाऊक बाजारात किमती कमी झाल्या की, त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवरही होतो, भाज्यांचे दर सुसह्य होतात. मात्र यावेळी मुंबईकरांना हा दिलासा मिळालेला नाही.
सांगली, सातारा, धुळे, पुणे, सोलापूर, कर्नाटकाच्या काही भागांत पाऊस थांबल्यामुळे भाज्यांचे प्रमाण वाढले आहे. उष्मा वाढल्याने उत्पादनात फरक पडला असला तरीही भाज्यांची गुणवत्ता मात्र वधारलेली नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी भाज्यांवर आलेल्या विविध प्रकारच्या रोगांसाठी यावेळी आर्थिक तुटीमुळे पुरेशी औषधफवारणी केलेली नाही. दादर, माहीम, भायखाळा, मुलुंड, अंधेरी, बोरिवलीतील किरकोळ भाजीबाजारात दरामध्ये सातत्य नाही. घाऊक बाजारांमधून अवघे २० रु. किलोला उचललेल्या भाज्या हे विक्रेते १०० ते १२० रु. किलो दराने ग्राहकांना विकतात. पितृपक्ष सुरू झाल्यानंतर भाज्यांच्या किमती वाढतील ही घाऊक व्यापाऱ्यांची अटकळ खोटी ठरली आहे. 'गेल्या काही दिवसांपासून बाजार साफ पडल्याने व्यापाऱ्यांमध्येही निराशा आहे. किरकोळ बाजारात ज्या भाज्या विकल्या जातात त्यांची चवही फिकी आहे. अनेकदा भाज्या टाकून देण्याइतकी वाईट परिस्थिती व्यापाऱ्यांपुढे उद्भवते. ही परिस्थिती बदलावी व बाजार स्थिर व्हावा, याकडे व्यापारी डोळे लावून बसले आहेत', अशी प्रतिक्रिया एपीएमसी घाऊक भाजीविक्रेता संघाच्या प्रशांत जगताप यांनी दिली.
वाटाणा, फ्लॉवरला मागणी; गाजर गायब
हिरवा वाटाणा आणि फ्लॉवर या दोन भाज्यांची मागणी वाढली आहे. उष्म्यामुळे सिमला मिरचीचे दर वाढले आहेत. मात्र मागणी आटली आहे. बीट बाजारात दिसत असला, तरीही गाजर मात्र गायब झाला आहे. वांगी, भोपळा, गवार मुबलक असूनही भाव अधिक आहे. चायनीज आले व कोथिंबिरीचे दरही वाढलेले आहेत. पंधरा ते वीस रुपयांना तीन लिंबू बाजारात मिळत आहेत. पालेभाज्यांमध्ये पालक कमी असून, शेपू, चवळी व लाल माठाच्या किमती वीस ते पंचवीस रुपये जुडी आहे.
किरकोळ बाजाराचे चित्र (प्रतिकिलो)
सिमला मिरची - १०० ते १२० रु.
भोपळा - ८० ते १०० रु.
गवार - ११० ते १२० रु.
काकडी - ८० ते ९० रु.
वांगी - ६० ते ८० रु.
कोबी - ८० ते ९० रु.
पडवळ- ५० ते ६० रु.
कोथिंबीर - ३५ ते ५० रु. जुडी
शिराळी - ५० ते ७० रु.
बीट - ६० ते ८० रु.
उष्मा वाढल्यामुळे भाज्यांचे पीक अमाप आले आहे. घाऊक बाजारामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या भाज्यांचे प्रमाणही वाढले आहे. मुंबईतील घाऊक बाजारासह नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेतही भाज्यांच्या किमती साफ कोसळल्या आहेत. किरकोळ विक्रेते खरेदी करायला येताना ज्या किमतीला भाज्या मागतात, त्या किमतीला देण्याची तयारीही घाऊक विक्रेत्यांची आहे. अशी परिस्थिती असतानाही मुंबईतील बाजारांत मात्र भाज्यांचे भाव चढेच आहेत. घाऊक बाजारात किमती कमी झाल्या की, त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवरही होतो, भाज्यांचे दर सुसह्य होतात. मात्र यावेळी मुंबईकरांना हा दिलासा मिळालेला नाही.
सांगली, सातारा, धुळे, पुणे, सोलापूर, कर्नाटकाच्या काही भागांत पाऊस थांबल्यामुळे भाज्यांचे प्रमाण वाढले आहे. उष्मा वाढल्याने उत्पादनात फरक पडला असला तरीही भाज्यांची गुणवत्ता मात्र वधारलेली नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी भाज्यांवर आलेल्या विविध प्रकारच्या रोगांसाठी यावेळी आर्थिक तुटीमुळे पुरेशी औषधफवारणी केलेली नाही. दादर, माहीम, भायखाळा, मुलुंड, अंधेरी, बोरिवलीतील किरकोळ भाजीबाजारात दरामध्ये सातत्य नाही. घाऊक बाजारांमधून अवघे २० रु. किलोला उचललेल्या भाज्या हे विक्रेते १०० ते १२० रु. किलो दराने ग्राहकांना विकतात. पितृपक्ष सुरू झाल्यानंतर भाज्यांच्या किमती वाढतील ही घाऊक व्यापाऱ्यांची अटकळ खोटी ठरली आहे. 'गेल्या काही दिवसांपासून बाजार साफ पडल्याने व्यापाऱ्यांमध्येही निराशा आहे. किरकोळ बाजारात ज्या भाज्या विकल्या जातात त्यांची चवही फिकी आहे. अनेकदा भाज्या टाकून देण्याइतकी वाईट परिस्थिती व्यापाऱ्यांपुढे उद्भवते. ही परिस्थिती बदलावी व बाजार स्थिर व्हावा, याकडे व्यापारी डोळे लावून बसले आहेत', अशी प्रतिक्रिया एपीएमसी घाऊक भाजीविक्रेता संघाच्या प्रशांत जगताप यांनी दिली.
वाटाणा, फ्लॉवरला मागणी; गाजर गायब
हिरवा वाटाणा आणि फ्लॉवर या दोन भाज्यांची मागणी वाढली आहे. उष्म्यामुळे सिमला मिरचीचे दर वाढले आहेत. मात्र मागणी आटली आहे. बीट बाजारात दिसत असला, तरीही गाजर मात्र गायब झाला आहे. वांगी, भोपळा, गवार मुबलक असूनही भाव अधिक आहे. चायनीज आले व कोथिंबिरीचे दरही वाढलेले आहेत. पंधरा ते वीस रुपयांना तीन लिंबू बाजारात मिळत आहेत. पालेभाज्यांमध्ये पालक कमी असून, शेपू, चवळी व लाल माठाच्या किमती वीस ते पंचवीस रुपये जुडी आहे.
किरकोळ बाजाराचे चित्र (प्रतिकिलो)
सिमला मिरची - १०० ते १२० रु.
भोपळा - ८० ते १०० रु.
गवार - ११० ते १२० रु.
काकडी - ८० ते ९० रु.
वांगी - ६० ते ८० रु.
कोबी - ८० ते ९० रु.
पडवळ- ५० ते ६० रु.
कोथिंबीर - ३५ ते ५० रु. जुडी
शिराळी - ५० ते ७० रु.
बीट - ६० ते ८० रु.