अ‍ॅपशहर

कॉलेजांत बायोमेट्रिक हजेरी

​​'इंटीग्रेटेड', अर्थात खासगी क्लासेस ही शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. अशा क्लासेसना चाप लावण्यासाठी विधेयक तयार करण्यात आले असून ते लवकरच मंजूर होईल. मात्र, या क्लासेसना तूर्त आळा घालण्यासाठी शाळा-कॉलेजांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी पद्धत सुरू करण्यात येणार आहे, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधिमंडळात स्पष्ट केले.

Maharashtra Times 17 Jul 2018, 3:00 am
संजय व्हनमाने, नागपूर:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम biometric attendance mandatory for college students to counter private classes
कॉलेजांत बायोमेट्रिक हजेरी


'इंटीग्रेटेड', अर्थात खासगी क्लासेस ही शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. अशा क्लासेसना चाप लावण्यासाठी विधेयक तयार करण्यात आले असून ते लवकरच मंजूर होईल. मात्र, या क्लासेसना तूर्त आळा घालण्यासाठी शाळा-कॉलेजांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी पद्धत सुरू करण्यात येणार आहे, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधिमंडळात स्पष्ट केले. ग्रामीण भागातील ज्या संस्था बायोमेट्रिकमधून पळवाटा काढण्याचा प्रयत्न करतील त्यांची चालू शैक्षणिक वर्षातच मान्यता रद्द केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यात सुमारे ५० हजारांहून अधिक खासगी क्लासेस असून, अनेक क्लासेसचे संचालक शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून पालकांची फसवणूक करीत असल्याबाबतची लक्षवेधी पराग अळवणी, आशीष शेलार यांनी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना तावडे बोलत होते. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे इंटीग्रेटेड क्लासेसचे पेव फुटले आहे. आयआयटी, मेडिकल या क्षेत्रांत विनासायास प्रवेश मिळवून देण्याचा दावा करीत हे क्लासेस विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचून घेतात. वास्तविक ८ ते ९ हजार जणांनाच प्रवेश मिळत असला तरी या परीक्षांना साडेपाच लाखांहून जास्त विद्यार्थी बसतात. त्यामुळे मोठ्या जाहिराती करून हे क्लासेस विद्यार्थ्यांचा विश्वास मिळवतात, असे तावडे म्हणाले.

बायोमेट्रिक पद्धत काही ठिकाणी लागू करताच कमी हजेरी लागलेल्या पाल्यांवर आपोआपच कारवाई झाली आहे. बायोमेट्रिकमध्ये विद्यार्थ्याने कोणत्या ठिकाणी उपस्थित राहून अंगठा लावला आहे तेही कळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे तावडे पुढे म्हणाले.

घरगुती शिकवणींवर कारवाई नाही

खासगी क्लासेसवर बंदी येणार असल्याने घरगुती शिकवणी घेणाऱ्या महिलांमध्ये घबराट निर्माण झाली असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. त्यावर, '२५ ते ५० विद्यार्थ्यांना शिकविताना अनेक महिला त्यातून आपले घर चालवत असतात. काही विद्यार्थीही शिकवणी घेऊन स्वत:चेही शिक्षण पार पाडत असतात. मात्र, अशांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही', असे तावडे यांनी स्पष्ट केले.

'सब्जेक्टिव्ह'वर अधिक लक्ष

दहावी-बारावीच्या अभ्यासक्रमाचीही आम्ही नव्याने मांडणी करीत आहोत. ऑब्जेक्टिव्हपेक्षा आम्ही सब्जेक्टिव्हवर अधिक लक्ष केंद्रीत करीत आहोत. सब्जेक्टिव्हमुळे विद्यार्थ्यांना विषयाचा सखोल अभ्यास करावा लागणार असून, यातूनच त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज