मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ यांनी 'जय श्रीराम' म्हणत अयोध्येतील राम मंदिराचं स्वागत केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असतानाच भाजपनं लगेचच संधी साधली आहे. पार्थ यांच्या भूमिकेवरून भाजपनं राष्ट्रवादी बरोबरच ठाकरे सरकारलाही टोला हाणला आहे.
वाचा: पार्थ पवारांच्या मनात काय? नव्या भूमिकेमुळं चर्चेला उधाण
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यास ठाकरे सरकारनं ठाम विरोध दर्शवला आहे. गृहखात्याची सूत्रे असलेल्या राष्ट्रवादीनं या प्रकरणात मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. असं असतानाही काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी गृहमंत्र्यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तर, अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुहूर्ताबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी दर्शवली होती. देशात करोनाचा कहर असताना भूमिपूजनाची घाई कशाला? राम मंदिर बांधल्यानं करोना जाईल असं काहींना वाटत असावं, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, पार्थ पवार यांनी थेट 'जय श्रीराम' म्हणत मंदिराच्या उभारणीचं स्वागत केलं आहे.
वाचा: ठाकरेंचा विश्वासू शिलेदार नाराज; मनधरणीसाठी 'वर्षा' निवासस्थानी झाली बैठक
पार्थ यांच्या या दोन्ही भूमिकांमुळं राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता असताना भाजपनं पार्थ यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. 'पार्थ पवार यांची राम मंदिर व सुशांतसिंह प्रकरणातील भूमिका या नव्या पिढीच्या भूमिका आहेत. त्यांच्या भूमिकांचं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि खुद्द राज्य सरकारनंही स्वागत केलं पाहिजे,' असं भाजपचे आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे.
वाचा: करोनाचा दाखला देत भाजप नेत्यांचे निवेदन हातात घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
वाचा: पार्थ पवारांच्या मनात काय? नव्या भूमिकेमुळं चर्चेला उधाण
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यास ठाकरे सरकारनं ठाम विरोध दर्शवला आहे. गृहखात्याची सूत्रे असलेल्या राष्ट्रवादीनं या प्रकरणात मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. असं असतानाही काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी गृहमंत्र्यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तर, अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुहूर्ताबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी दर्शवली होती. देशात करोनाचा कहर असताना भूमिपूजनाची घाई कशाला? राम मंदिर बांधल्यानं करोना जाईल असं काहींना वाटत असावं, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, पार्थ पवार यांनी थेट 'जय श्रीराम' म्हणत मंदिराच्या उभारणीचं स्वागत केलं आहे.
वाचा: ठाकरेंचा विश्वासू शिलेदार नाराज; मनधरणीसाठी 'वर्षा' निवासस्थानी झाली बैठक
पार्थ यांच्या या दोन्ही भूमिकांमुळं राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता असताना भाजपनं पार्थ यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. 'पार्थ पवार यांची राम मंदिर व सुशांतसिंह प्रकरणातील भूमिका या नव्या पिढीच्या भूमिका आहेत. त्यांच्या भूमिकांचं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि खुद्द राज्य सरकारनंही स्वागत केलं पाहिजे,' असं भाजपचे आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे.
वाचा: करोनाचा दाखला देत भाजप नेत्यांचे निवेदन हातात घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार