दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून भाजपचा बुडबुडा फुटला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केली. दिल्लीकरांनी मतदानाच्या माध्यमातून आपला विरोध प्रकट केला आहे. लोकप्रियतेची लाट आता ओसरल्याचे दिल्लीकरांनी या निकालातून भाजपला सांगितल्याचेही पाटील म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीचा विकास करत असताना भाजप त्यात अडथळे निर्माण करत होती. या सर्व परिस्थितीचा दिल्लीकरांनी समाचार घेतला आहे. केजरीवाल यांच्या बाजूने त्यांनी मतदान केले यातच नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे, असेही ते म्हणाले.
‘भाजपचा बुडबुडा फुटला’
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून भाजपचा बुडबुडा फुटला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2020, 4:00 am