अ‍ॅपशहर

Anant Gadgil: भाजप सरकार म्हणजे ‘नापास’ विद्यार्थ्यांचा ‘वर्ग’; 'या' नेत्याचा टोला

Anant Gadgil जीडीपी घसरणीचा उच्चांक आणि करोना बाधित रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात येत असलेलं अपयश यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Sep 2020, 4:20 pm
मुंबई: स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाची विकासवाढ २४ टक्क्यांनी घसरली आहे. एकीकडे सर्वात अपयशी अर्थमंत्री असे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले असतानाही दुसरीकडे अशा गंभीर व धक्कादायक बाबीवर काही प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक गप्प आहेत. अर्थव्यवस्था सावरायची प्राथमिक जबाबदारी अर्थमंत्र्यांची असल्यामुळे या परीक्षेत अर्थमंत्री ‘नापास’ झाल्याचे सिद्ध झाले आहे. संघाच्या 'वर्गात' वाढलेल्यांनी निदान या परीक्षांची तरी 'नीट' तयारी करावी, अशी उपरोधीक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम काँग्रेसचा भाजपवर निशाणा


वाचा: शिवसेनेनं काँग्रेसवाल्यांना पगारावर ठेवलंय; माजी खासदाराची बोचरी टीका

भाजप सरकारचा समाचार घेताना गाडगीळ पुढे म्हणाले, भारताचे आतापर्यंत मित्र राहिलेले उत्तरेकडील नेपाळ राष्ट्र हळूहळू चीनकडे सरकत आहे, पूर्वेकडे भुतान व बांगलादेशाला चीन चुचकारू लागला आहे, दक्षिणेकडे श्रीलंकेत चिनी नौदलाचा तळ उभारला जात आहे, पश्चिमेकडे इराणने अब्जावधी रुपयांच्या रेल्वेमार्गाचे काम भारताकडून काढून घेत चीनला दिले. यावरून मित्र राष्ट्रांसोबत योग्य धोरण राबविण्यात परराष्ट्रमंत्री अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट होते. हेरगिरी करताना अमेरिकेत पकडलेल्या अॅलन हो या चिनी हेराला ज्या ‘बँक ऑफ चायना’ मधील एका गुप्त खात्यातून पैसे पूरविल्याचा अहवाल एफबीआयने दिला त्याच बँकेला मुंबईतील बीकेसीमध्ये कार्यालय उघडण्यास परवानगी देणे ह्यात केंद्रीय गृह खात्याचा बेजबाबदारपणा दिसून येतो.

वाचा: भारत का जीडीपी डुबा; तब रसोडे मे कौन था? काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

सिंगापूर, न्यूझीलंड, व्हिएतनामपासून दुबईपर्यंत अनेक राष्ट्रांनी जानेवारीतच आपले विमानतळ बंद केले असताना ट्रम्प यांच्या गुजरातमधील निवडणूक मेळाव्यासाठी मार्चअखेर पर्यंत भारताने विमानतळ उघडे ठेवले. १ जानेवारी ते १५ मार्च या काळात १० लाख प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले असता केवळ १९ टक्के प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती, तीसुद्धा पूर्वेकडून आलेल्यांची. आता तर करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसाला ८० हजारांवर पोहोचली आहे. राज्यांशी योग्य समन्वय न साधल्याचे हे दुष्परिणाम आहेत. हवाई वाहतूकमंत्री व आरोग्यमंत्री दोघेही निष्भ्रम ठरले आहेत, असा आरोपही गाडगीळ यांनी केला. जीडीपी घसरणीत उच्चांक, करोना बाधित रुग्णसंख्येत उच्चांक गाठला गेला असून अर्थ, आरोग्य, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, गृह अश्या सर्व आघाड्यांवर अपयशी ठरणारे केंद्रातील भाजप सरकार म्हणजे 'नापास' विद्यार्थ्यांचा 'वर्ग' झाला आहे. संघाच्या 'वर्गात' वाढलेल्यांनी निदान या परीक्षांची तरी 'नीट' तयारी करावी अशी उपरोधिक व खरमरीत टीका अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

वाचा: उद्धव ठाकरे सर्वाधिक काळ घरात राहणारे पहिलेच मुख्यमंत्री; भाजपची खोचक टीका

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज