अ‍ॅपशहर

chandrakant patil : चंद्रकांतदादांनी राऊतांना दिले 'हे' चार विषय; म्हणाले, 'रोखठोक' लिहा!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( chandrakant patil )यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना दैनिक सामनातील रोखठोक सदरासाठी काही विषय दिले आहेत. हे विषय देताना त्यांनी राऊत यांना कोपरखळ्याही लगावल्या आहेतय

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jul 2020, 1:41 pm
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या 'सामना'तून विरोधकांवर टीकास्त्र सोडण्यात येत असल्याने भाजपही आक्रमक झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर शिवसेना नेते संजय राऊत यांना रोखठोकसाठी चार विषय दिले असून त्यावर लिहिण्यास सांगितलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay raut- chandrakant patil


चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून शिवसेना नेते संजय राऊत यांना त्यांच्या सामनातील रोखठोक या सदरासाठी चार विषय दिले आहेत. तसेच या विषयावर लिहिण्यासह सांगितले आहे. हे विषय देताना पाटील यांनी त्यावर उपरोधिक भाष्य करत राऊतांना टोलेही लगावले आहेत.

Sharad Pawar: बाळासाहेब आणि भाजपचे विचार कधीच सुसंगत नव्हते-शरद पवार


राऊतांना सूचवण्यात आलेले चार विषय

प्रस्ताव नं. १ : मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय १० आयपीएस अधिकाऱ्यांची बदली... ठाकरे सरकारचा कारभार अतिशय पारदर्शी आहे... तीन दिवसात बदलीचे आदेश रद्द...

टोला : मुख्यमंत्री कोण आहेत हे तर आम्ही दाखवून दिलं... हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे...

प्रस्ताव नं. २ : पारनेर नगरपरिषदेत अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला... सर्वांना आपापला पक्ष वाढवण्याची इच्छा होतच असते...

टोला : पवार साहेब आणि ठाकरे साहेब दोन्हीही आपलेच आहेत... मात्र तरीही शिवसेना शांत बसणार नाही... हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे.

प्रस्ताव नं. ३ : ठाकरे सरकार तर सर्वोत्तम आहे... यापूर्वी राज्याला असे प्रशासन कधीही लाभले नाही... मात्र कोरोनाचा मृत्युदर वाढत चालला आहे...

टोला : दिवसाला ६ हजारपेक्षा जास्त करोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत... हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे...

प्रस्ताव नं. ४ : राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी केल्याचे ढोल बडवले... अजूनही अंमलबजावणी नाही... शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे दिले जात आहेत....

टोला : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अजूनही कर्ज देण्यात आलं नाही... हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे...

पोलिसांनी सूड घेतला; सवाल कशाला करता?; दुबे एन्काउंटरचं शिवसेनेकडून समर्थन

Sanjay Raut: 'फडणवीसांना त्यांचा राजकीय अभ्यास पक्का करावा लागेल'

Sharad Pawar: शरद पवारांच्या मुलाखतीची इतकी चर्चा का? हे आहे खरं कारण

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज