अ‍ॅपशहर

'राहुल गांधी सीरियस राजकारणी नाहीत हे 'त्यांना' माहीत नव्हते का?'

बिहारमधील (Bihar) पराभवासाठी काँग्रेसला जबाबदार धरणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Nov 2020, 9:10 pm
मुंबई: 'राहुल गांधी हे सीरियस राजकारणी नाहीत. ते पिकनिक वगैरे करत असतात. राष्ट्रीय जनता दलाला हे आधी माहीत नव्हतं का?,' असा प्रश्न महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Fadnavis-Rahul Gandhi


बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी आज शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला केंद्रातील अनेक नेते उपस्थित होते. बिहार निवडणुकीचे प्रभारी असलेले फडणवीस यांनीही शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. त्यानंतर 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी काही प्रश्नांना उत्तरं दिली.

वाचा: '...म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना डोक्यावर घेतेय'

बिहारच्या निवडणुकीत राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा पराभव झाला. काँग्रेस देखील या महाआघाडीचा एक भाग होती. राजदनं बलाढ्या भाजप व संयुक्त जनता दलाला टक्कर देत सर्वाधिक जागा मिळवल्या. मात्र, काँग्रेसनं मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिक जागा लढवूनही त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. काँग्रेसला केवळ १९ जागा मिळाल्या. त्यांच्या कमी जागांमुळंच महाआघाडीची पीछेहाट झाल्याचं आता बोललं जात आहे. त्यातच निवडणुकीच्या काळात राहुल गांधी हे शिमल्यात पिकनिक करत होते, अशीही माहिती आता पुढं आली आहे. त्यामुळं राजदच्या नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेसच्या या कारभारामुळं भाजपला मदतच होत आहे.

वाचा: 'पुढची चार वर्षे कशी जातील हे भाजपला कळणारही नाही'

याबाबत बोलताना फडणवीस यांनी राष्ट्रीय जनता दलावर टीका केली. 'राहुल गांधी हे सीरियस राजकारणी नाहीत. ते पिकनिक वगैरे करतात हे राजदला माहीत नव्हते का? त्यांना हे सगळं माहीत होतं, पण, आता अपयशाचं खापर त्यांच्यावर फोडलं जात आहे,' असं फडणवीस म्हणाले.

वाचा: शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता; 'या' नेत्याचा दावा

'बिहारच्या मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार होईल. आणखी काही जण शपथ घेतील. तरुण पिढीला संधी देण्याची भाजपची कार्यपद्धतीच आहे,' असं फडणवीस म्हणाले. 'हे सरकार उत्तम काम करेल आणि बिहारला आणखी पुढे घेऊन जाईल,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वाचा: पालघर साधू हत्याकांड आम्ही विसरलेलो नाही; भाजपचा इशारा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज