मुंबई: राज्यात कुण्या एका पक्षाने विशिष्ट तारखेपर्यंत सत्ता स्थापन केली नाही, तर भारतीय राज्यघटनेत काय तरतूद आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर आपण, '... तर राष्ट्रपती राजवट येऊ शकते', असे उत्तर दिल्याचे सांगत या वक्तव्याचा शिवसेनेला राग येणे गैर असून शिवसेना पक्ष वड्याचे तेल वांग्यावर आणि वांग्याचे तेल वड्यावर काढत आहे, असा पलटवार, भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची धमकी देऊन जनमताचा अपमान करत असल्याची टीका शिवेसनेते प्रवक्ता संजय राऊत यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केले आहे. शिवसेनाचा राग वेगळ्याच गोष्टीवर असून तो प्रत्यक्षात भलत्याच गोष्टींवर व्यक्त केला जात असण्याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले आहे.
'झाडाचं पान पडलं की म्हणायचं आकाश पडलं'
'राष्ट्रपती राजवट' वक्तव्यावरील शिवसेनेच्या भूमिकेची खिल्ली उडवताना मुनगंटीवार म्हणाले की, लहानपणी शाळेत असताना बालभारतीमध्ये एक धडा होता. या धड्यात एका झाडाचे पान खाली पडल्यानंतर ससा घाबरतो. त्यावा वाटते की आकाश कोसळले आहे. तो 'आकाश कोसळले, पळा पळा' असे सांगत असतो. शिवसेनेने आपल्या वक्तव्याचा असाच चुकीचा अर्थ घेतला आहे. म्हणूनच कोणत्याही शब्दाचा अर्थ लावताना चूक करू नये, असा टोलाही मुनगंटीवार यांनी राऊत यांना लगावले.
वाचा- अमित शहांची मध्यस्थी सोडवू शकते सत्तेचा पेच?
६ तारखेअगोदर राज्यात सरकार स्थापन होणार
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. सत्ता स्थापनेवरून दोन्ही बाजूंकडून वाक् युद्ध सुरू झालेले असतानाही, राज्यात ६ नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन होईल, हे निश्चित आहे असे मुनगंटीवार म्हणाले. राष्ट्रपती राजवटीबाबत आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत होतो, त्यामुळे शिवसेनेला माझ्या वक्तव्यावर रागावण्याचे काहीच कारण नाही. तसे शिवसेनेवर आम्हीही राग काढू शकतो. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून शिवसेनेने इतर कोणत्याही विरोधी पक्षांवर इतकी टीका केली नसेल, तितकी जहरी टीका भाजपवर सतत केली आहे. मात्र, आम्ही यावर जराही रागावलेलो नाही. जेव्हा आपण राज्याच्या विकासाचा विचार करत असतो तेव्हा अशा क्षणिक गोष्टीचा राग करायचा नसतो, अशा समजावणीच्या सूरात मुनगंटीवार यांनी शिवसेनेला मित्रत्वाचा सल्ला दिला आहे. समान सत्तावाटपाबाबतच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याबाबतही राग व्यक्त करणे गैर असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
वाचा- सेनेला पाठिंबा?, पवार-सोनिया भेट सोमवारी
वाचा- राष्ट्रपती राजवटीची धमकी हा जनादेशाचा अपमान!
'शिवसेना काँग्रेससोबत कधीही जाणार नाही'
काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला तरी देखील काँग्रेसचा पाठिंबा शिवसेना घेणार नाही. याचे कारण म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसच्या विचारधारा पूर्णपणे भिन्न आहेत, असेही मुनगंटीवार एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे नाते पाण्यासारखे आहे. पाण्यावर कितीही काठी मारली तरी पाणी दुभंगत नाही, तसेच भाजप-शिवसेनेचे असल्याचे ते म्हणाले.
वाचा- काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा द्यावा: दलवाई
'झाडाचं पान पडलं की म्हणायचं आकाश पडलं'
'राष्ट्रपती राजवट' वक्तव्यावरील शिवसेनेच्या भूमिकेची खिल्ली उडवताना मुनगंटीवार म्हणाले की, लहानपणी शाळेत असताना बालभारतीमध्ये एक धडा होता. या धड्यात एका झाडाचे पान खाली पडल्यानंतर ससा घाबरतो. त्यावा वाटते की आकाश कोसळले आहे. तो 'आकाश कोसळले, पळा पळा' असे सांगत असतो. शिवसेनेने आपल्या वक्तव्याचा असाच चुकीचा अर्थ घेतला आहे. म्हणूनच कोणत्याही शब्दाचा अर्थ लावताना चूक करू नये, असा टोलाही मुनगंटीवार यांनी राऊत यांना लगावले.
वाचा- अमित शहांची मध्यस्थी सोडवू शकते सत्तेचा पेच?
६ तारखेअगोदर राज्यात सरकार स्थापन होणार
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. सत्ता स्थापनेवरून दोन्ही बाजूंकडून वाक् युद्ध सुरू झालेले असतानाही, राज्यात ६ नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन होईल, हे निश्चित आहे असे मुनगंटीवार म्हणाले. राष्ट्रपती राजवटीबाबत आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत होतो, त्यामुळे शिवसेनेला माझ्या वक्तव्यावर रागावण्याचे काहीच कारण नाही. तसे शिवसेनेवर आम्हीही राग काढू शकतो. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून शिवसेनेने इतर कोणत्याही विरोधी पक्षांवर इतकी टीका केली नसेल, तितकी जहरी टीका भाजपवर सतत केली आहे. मात्र, आम्ही यावर जराही रागावलेलो नाही. जेव्हा आपण राज्याच्या विकासाचा विचार करत असतो तेव्हा अशा क्षणिक गोष्टीचा राग करायचा नसतो, अशा समजावणीच्या सूरात मुनगंटीवार यांनी शिवसेनेला मित्रत्वाचा सल्ला दिला आहे. समान सत्तावाटपाबाबतच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याबाबतही राग व्यक्त करणे गैर असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
वाचा- सेनेला पाठिंबा?, पवार-सोनिया भेट सोमवारी
वाचा- राष्ट्रपती राजवटीची धमकी हा जनादेशाचा अपमान!
'शिवसेना काँग्रेससोबत कधीही जाणार नाही'
काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला तरी देखील काँग्रेसचा पाठिंबा शिवसेना घेणार नाही. याचे कारण म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसच्या विचारधारा पूर्णपणे भिन्न आहेत, असेही मुनगंटीवार एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे नाते पाण्यासारखे आहे. पाण्यावर कितीही काठी मारली तरी पाणी दुभंगत नाही, तसेच भाजप-शिवसेनेचे असल्याचे ते म्हणाले.
वाचा- काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा द्यावा: दलवाई