म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
नांदेडमधील विजय हा नागरिकांचा भाजपच्या केंद्र व राज्य सरकार राबवित असलेल्या चुकीच्या धोरणांवरील रागाची परिणती आहे. जसा परतीचा पाऊस येतो तशी ही नांदेडपासून भाजपच्या परतीची झालेली सुरुवात राज्यात व देशातही पाहायला मिळेल, असे गुरुवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधील विजयावर बोलताना म्हणाले.
नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाची वीण घट्टच आहे. मात्र येवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक आमच्यावर विश्वास टाकतील अशी आमचीही अपेक्षा नव्हती. नोटाबंदी, जीएसटी, फसलेली कर्जमुक्ती या सगळ्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाबाहेरील लोकांवर ठेवलेल्या भिस्तीमुळेच आम्हाला हा विजय सुकर झाल्याचे चव्हाण म्हणाले. भाजप आजपर्यंत सोशल मीडियाचा गैरवापर करत होता. आता आम्ही त्याचा वापर करू लागल्यावर त्याच्या विरोधात सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. मात्र, नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने बसणारे चटके नागरिकांना सोसावे लागत आहेत. जीएसटीमुळे महागाई वाढली आहे. शेतकरी व शेतीवर अवलंबून असलेली व्यवसाय प्रचंड अडचणीत आहेत. कर्जमुक्तीच्या नावाने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राज्यात मतविभाजन होऊ नये, अशीच आमची इच्छा आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
लोकशाही अद्याप जिवंत
आम्हाला पाडण्यासाठी सत्ताधारी भाजपने सगळ्या क्लृप्त्या वापरून पाहिल्या. सत्ता, संपत्ती, साधने यांचा प्रचंड वापर करून हरविण्यासाठी अनेक रणनीत्या आखल्या गेल्या. मात्र या देशातील मायबाप नागरिकच सर्व काही ठरवत असतात. निवडणुकीत कितीही सत्ता-संपत्तीचा वापर केला तरी या देशातील लोकशाही जिवंत आहे, हेच नांदेडच्या विजयाने दाखवून दिले, असे चव्हाण म्हणाले.
नांदेडमधील विजय हा नागरिकांचा भाजपच्या केंद्र व राज्य सरकार राबवित असलेल्या चुकीच्या धोरणांवरील रागाची परिणती आहे. जसा परतीचा पाऊस येतो तशी ही नांदेडपासून भाजपच्या परतीची झालेली सुरुवात राज्यात व देशातही पाहायला मिळेल, असे गुरुवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधील विजयावर बोलताना म्हणाले.
नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाची वीण घट्टच आहे. मात्र येवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक आमच्यावर विश्वास टाकतील अशी आमचीही अपेक्षा नव्हती. नोटाबंदी, जीएसटी, फसलेली कर्जमुक्ती या सगळ्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाबाहेरील लोकांवर ठेवलेल्या भिस्तीमुळेच आम्हाला हा विजय सुकर झाल्याचे चव्हाण म्हणाले. भाजप आजपर्यंत सोशल मीडियाचा गैरवापर करत होता. आता आम्ही त्याचा वापर करू लागल्यावर त्याच्या विरोधात सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. मात्र, नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने बसणारे चटके नागरिकांना सोसावे लागत आहेत. जीएसटीमुळे महागाई वाढली आहे. शेतकरी व शेतीवर अवलंबून असलेली व्यवसाय प्रचंड अडचणीत आहेत. कर्जमुक्तीच्या नावाने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राज्यात मतविभाजन होऊ नये, अशीच आमची इच्छा आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
लोकशाही अद्याप जिवंत
आम्हाला पाडण्यासाठी सत्ताधारी भाजपने सगळ्या क्लृप्त्या वापरून पाहिल्या. सत्ता, संपत्ती, साधने यांचा प्रचंड वापर करून हरविण्यासाठी अनेक रणनीत्या आखल्या गेल्या. मात्र या देशातील मायबाप नागरिकच सर्व काही ठरवत असतात. निवडणुकीत कितीही सत्ता-संपत्तीचा वापर केला तरी या देशातील लोकशाही जिवंत आहे, हेच नांदेडच्या विजयाने दाखवून दिले, असे चव्हाण म्हणाले.