अ‍ॅपशहर

'राहुल गांधींनी ज्यांच्याशी हात मिळवला, ते बुडाले'

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. (BJP targets Rahul Gandhi)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Nov 2020, 5:31 pm
मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप पूर्ण झाली नसली तरी सर्व जागांवरील कल हाती आले आहेत. त्यानुसार, भाजप-संयुक्त जनता दलाची आघाडी बहुमताच्या दिशेनं वाटचाल करत आहे. या निकालामुळं भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण असून भाजपचे नेते विरोधकांना लक्ष्य करू लागले आहेत. महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी या निमित्तानं काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rahul Gandhi-Tejashwi Yadav


वाचा: मोदींचा करिष्मा संपलाय हे बिहारमध्ये दिसलं; भुजबळांचा टोला

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानं काँग्रेसशी आघाडी करून निवडणूक लढवली होती. राष्ट्रीय जनता दलानं या निवडणुकीत चांगली कामगिरी केली असली तरी काँग्रेसला फार मजल मारता आलेली नाही. त्याचा परिणाम अंतिम निकालावर होणार आहे. हीच संधी साधून महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

वाचा: बिहारच्या निकालांवर संजय राऊत यांची सूचक प्रतिक्रिया

'राहुल गांधी यांनी ज्याच्या सोबत हात मिळवले ते बुडाले,' अशी बोचरी टीका त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. उत्तर प्रदेशात त्यांनी अखिलेश यादव यांच्यासोबत आघाडी केली. तिथं समाजवादी पक्षाला पराभव पत्करावा लागला. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी काँग्रेसला जवळ केले. त्यामुळं डाव्यांना ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडून सपाटून मार खावा लागला. आता तेजस्वी यादव हे काँग्रेससोबत गेले आणि पराभूत झाले,' असं उपाध्ये यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे.

वाचा: सुटकेसाठी अर्णव गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज