मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे भाजपकडून मात्र या अटकेचं जोरदार समर्थन केलं जात असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Nawab Malik Latest News)
'ईडीच्या अटकेत असलेल्या नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या परखड नेतृत्वाचा वारसा असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांना मंत्रिपदावरून दूर करावं, अन्यथा आम्हाला राज्यभर आंदोलन करावं लागेल,' असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
'राज्य सरकारमधील एका मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्येमुळे आपलं पद सोडावं लागलं, गृहमंत्री राहिलेला व्यक्ती आता तुरुंगात आहे, एका मंत्र्याला दोन बायका असल्याचं समोर आलं, काही मंत्र्यांचे अनधिकृत बंगले पाडण्याच्या नोटिसा निघाल्या,' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
नवाब मलिक यांना का अटक झाली?
नवाब मलिक यांना आज सकाळीच ईडीकडून चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. त्यानंतर तब्बल ७ तास मलिक यांची चौकशी झाली आणि अखेर त्यांना अटक करण्यात आली. मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसंच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. चौकशीत इकबाल कासकर याने मलिक यांचे नाव घेतल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मलिक यांची चौकशी होऊन त्यांना अटकही करण्यात आली आहे.
'ईडीच्या अटकेत असलेल्या नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या परखड नेतृत्वाचा वारसा असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांना मंत्रिपदावरून दूर करावं, अन्यथा आम्हाला राज्यभर आंदोलन करावं लागेल,' असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
'राज्य सरकारमधील एका मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्येमुळे आपलं पद सोडावं लागलं, गृहमंत्री राहिलेला व्यक्ती आता तुरुंगात आहे, एका मंत्र्याला दोन बायका असल्याचं समोर आलं, काही मंत्र्यांचे अनधिकृत बंगले पाडण्याच्या नोटिसा निघाल्या,' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
नवाब मलिक यांना का अटक झाली?
नवाब मलिक यांना आज सकाळीच ईडीकडून चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. त्यानंतर तब्बल ७ तास मलिक यांची चौकशी झाली आणि अखेर त्यांना अटक करण्यात आली. मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसंच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. चौकशीत इकबाल कासकर याने मलिक यांचे नाव घेतल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मलिक यांची चौकशी होऊन त्यांना अटकही करण्यात आली आहे.