अ‍ॅपशहर

मुख्यमंत्र्यांचे दूत शिवसेनेच्या बंडखोरांकडे

महापालिका निवडणुकीत महापौर बसविण्यासाठी समान संधी लाभल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये महापौरपदाचे तख्त मिळविण्यासाठी जोरदार चुरस सुरू झाली आहे. मॅजिक फिगर गाठण्यासाठी एक-एक मत महत्त्वाचे असल्याने या दोन्ही पक्षांनी बंडखोर आणि अपक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या

Maharashtra Times 24 Feb 2017, 4:13 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp wants rebels vote
मुख्यमंत्र्यांचे दूत शिवसेनेच्या बंडखोरांकडे


महापालिका निवडणुकीत महापौर बसविण्यासाठी समान संधी लाभल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये महापौरपदाचे तख्त मिळविण्यासाठी जोरदार चुरस सुरू झाली आहे. मॅजिक फिगर गाठण्यासाठी एक-एक मत महत्त्वाचे असल्याने या दोन्ही पक्षांनी बंडखोर आणि अपक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या बंडखोरांना आपल्या बाजुला वळविण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुत बंडखोरांच्या घरापर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे बंडखोरांचा 'भाव' चांगलाच वधारला आहे.

शिवसेनेचे विभागप्रमुख सुधीर मोरे यांनी शिवसेने विरोधात बंडखोरी करून त्यांची भावजय स्नेहल मोरे यांना विक्रोळीतून निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. त्यामुळे शिवसेनेत खळबळ माजली होती. मोरे यांच्या बंडामुळे शिवसैनिक आणि मोरे यांच्यात बाचाबाची होऊन हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलं होतं. पण अशाही परिस्थिती मोरे यांनी त्याच्या भावजयला निवडून आणले. तर दुसरीकडे महापालिकेत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे अपक्ष आणि बंडखोरांना भाव आला आहे. स्नेहल मोरे यांनाही महत्त्व आले आणि त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सेना-भाजपनं अटापिटा सुरू केला. पण मोरे यांनी भाजपसोबत जाण्यापेक्षा शिवसेनेतच जाणं पसंत केल्यानं भाजपचा हिरमोड झाला आहे.

'मला कालपासूनच खासदार किरीट सोमय्या, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार राम कदम यांचे फोन आले. त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याची विनंती केली. तुम्ही आमच्याकडे या बोलणी करू असे निरोपही देण्यात आले. पण मी त्यासर्वांना स्पष्ट शब्दात नकार दिला. मी हाडाचा शिवसौनिक आहे. त्यामुळे मी स्वगृहीच परतणार असल्याचं त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं,' असं सुधीर मोरे यांनी स्पष्ट केले.

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊनही काही लोक आले होते. त्यांनी बरीच गळ घातली. पण नकार दिल्यावर जो निर्णय घ्यायचा तो घ्या, पण एकदा साहेबांशी भेट तरी घ्या,' असा निरोपही देण्यात आल्याचे मोरे यांनी शेवटी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज