मुंबई: राज्यात पुन्हा युतीची सत्ता येणार असल्याची चिन्हे दिसत असल्याने दोन्ही काँग्रेसमधून भाजपकडे येणाऱ्या नेत्यांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे भाजपला सर्वच नेत्यांना तिकीट देणं शक्य नसल्याने पक्षांतर करणाऱ्या काही नेत्यांना भाजपने शिवसेनेकडे पाठवले असून सेनेच्या चिन्हावर या उमेदवारांना निवडून आणण्याची आणि काही मतदारसंघांची आदलाबदली करण्याची मोर्चे बांधणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजप आपला उमेदवार शिवसेनेत पाठवून त्याला निवडून आणण्याचा 'पालघर पॅटर्न' विधानसभेतही राबवणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत सातारा आणि पालघर मतदारसंघात भाजपाने शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत पालघरची जागा भाजपाला राखता आली. हाच पॅटर्न आता विधानसभेतही राबवण्याचा युतीचा मानस असून त्यादृष्टीने जोरदार चर्चा सुरू आहे. युतीतील काही जागांची अदलाबदल होण्याची चर्चा जोरात सुरू असून त्यातीलच मुंबईतील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या एका मतदारसंघाची जागा भाजपचा उमेदवार धनुष्यबाणावर लढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर होताच सर्व पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी जोरदारपणे सुरू झाली आहे. भाजपा शिवसेनेच्या युतीबाबत अद्याप अंतिम स्पष्टता नसली तरी युती अबाधित राहणार याबाबत कुणालाही शंका नाही. ज्याप्रमाणे सातारा आणि पालघरमध्ये भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढले होते त्याचप्रमाणे वडाळा मतदारसंघासह अन्य काही मतदारसंघातही भाजपाचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे आदलाबदल होणाऱ्या मतदारसंघात गेल्या काही काळात भाजपाने केलेली कामे आणि शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी पाहता हे मतदारसंघ भाजपला सोडले जाण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. युतीतील या नव्या फॉर्मुल्यामुळे युतीच्या जागा वाढण्याचीही संधी निर्माण होणार असल्याने या भागातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत सातारा आणि पालघर मतदारसंघात भाजपाने शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत पालघरची जागा भाजपाला राखता आली. हाच पॅटर्न आता विधानसभेतही राबवण्याचा युतीचा मानस असून त्यादृष्टीने जोरदार चर्चा सुरू आहे. युतीतील काही जागांची अदलाबदल होण्याची चर्चा जोरात सुरू असून त्यातीलच मुंबईतील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या एका मतदारसंघाची जागा भाजपचा उमेदवार धनुष्यबाणावर लढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर होताच सर्व पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी जोरदारपणे सुरू झाली आहे. भाजपा शिवसेनेच्या युतीबाबत अद्याप अंतिम स्पष्टता नसली तरी युती अबाधित राहणार याबाबत कुणालाही शंका नाही. ज्याप्रमाणे सातारा आणि पालघरमध्ये भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढले होते त्याचप्रमाणे वडाळा मतदारसंघासह अन्य काही मतदारसंघातही भाजपाचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे आदलाबदल होणाऱ्या मतदारसंघात गेल्या काही काळात भाजपाने केलेली कामे आणि शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी पाहता हे मतदारसंघ भाजपला सोडले जाण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. युतीतील या नव्या फॉर्मुल्यामुळे युतीच्या जागा वाढण्याचीही संधी निर्माण होणार असल्याने या भागातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे.