उर्मिला यांच्याविरोधात तक्रार मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे आणि पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चैतन्य जोशी यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेली तक्रार ही निराधार व चुकीच्या हेतूने दाखल केली आहे. तक्रारदार भाजपची व्यक्ती आहे, अशी प्रतिक्रिया उर्मिला यांनी व्यक्त केली. भावना दुखावल्याचा आरोप करत सुरेश नखुआ यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारींना कोणताही ठोस आधार नसल्याचे उर्मिला यांनी म्हटले आहे.
उर्मिला यांच्याविरोधात तक्रार
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे आणि पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे...
MT 8 Apr 2019, 4:00 am