युती तुटल्यानंतर किरीट सोमय्यांचा वार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा चिखल उडवण्याचे काम सुरू झाले आहे. शिवसेनेची २५ वर्षे युतीत सडल्याचा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवल्यानंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी सेनेची पालिकेतील कारकीर्द सर्वात भ्रष्ट असल्याचा आरोप केला आहे. सेनेच्या भ्रष्टाचारावर पुढील आठ दिवसांत काळा पेपर प्रसिद्ध करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
घाटकोपर येथे झालेल्या एका कार्यक्रमात सोमय्या यांनी सेनेवर सडकून टीका केली. पालिकेतील भ्रष्ट कारभार आम्ही लवकरच चव्हाट्यावर आणणार असल्याचे सांगत पारदर्शक कारभारावर भाजप ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेत रस्ते, पाणी, पूल यासह विविध १२ प्रकारचे माफिया असल्याच्या आपल्या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केला. पालिका निवडणुकीच्या प्रचारात माफियाराजचा पर्दाफाश केला जाणार आहे.
कॅग आणि मुंबई उच्च न्यायालयानेही पालिकेत बेबंद भ्रष्टाचार असल्याची टीका केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना या निवडणुकीत माफियाच्या रावणाचे दहन करावे लागणार आहे. ही माफियागिरी आम्ही बंद करून पालिकेत परिवर्तन घडवू, असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला.
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा चिखल उडवण्याचे काम सुरू झाले आहे. शिवसेनेची २५ वर्षे युतीत सडल्याचा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवल्यानंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी सेनेची पालिकेतील कारकीर्द सर्वात भ्रष्ट असल्याचा आरोप केला आहे. सेनेच्या भ्रष्टाचारावर पुढील आठ दिवसांत काळा पेपर प्रसिद्ध करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
घाटकोपर येथे झालेल्या एका कार्यक्रमात सोमय्या यांनी सेनेवर सडकून टीका केली. पालिकेतील भ्रष्ट कारभार आम्ही लवकरच चव्हाट्यावर आणणार असल्याचे सांगत पारदर्शक कारभारावर भाजप ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेत रस्ते, पाणी, पूल यासह विविध १२ प्रकारचे माफिया असल्याच्या आपल्या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केला. पालिका निवडणुकीच्या प्रचारात माफियाराजचा पर्दाफाश केला जाणार आहे.
कॅग आणि मुंबई उच्च न्यायालयानेही पालिकेत बेबंद भ्रष्टाचार असल्याची टीका केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना या निवडणुकीत माफियाच्या रावणाचे दहन करावे लागणार आहे. ही माफियागिरी आम्ही बंद करून पालिकेत परिवर्तन घडवू, असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला.