मुंबई : रक्तदानाविषयी प्रचार-प्रसार मोहिमेमुळे रक्तांची तूट आता भरून निघत आहे; मात्र साथीच्या आजारामध्ये प्लेटलेट्सचीही मोठ्या प्रमाणात गरज असते. पालिका रुग्णालयांमध्ये रक्तापासून प्लेटलेट अलग करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले तर सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल, हे लक्षात घेऊन आता घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांची निकडीच्या वेळी होणारी धावपळ थांबणार आहे. डेंग्यू, मलेरिया तसेच अन्य काही आजारांमध्ये रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्स वेगाने घटतात, त्या नैसर्गिकरीत्या वाढल्या नाहीत, तर बाहेरून द्याव्या लागतात. त्यामुळे रुग्णालयातच ही सुविधा आता उपलब्ध करण्यात आली आहे. या केंद्रासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. रीतसर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने रोटरी क्लब आणि हायपन ग्रुपच्या मदतीने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
राजावाडीत रक्तपेढीची सुविधा उपलब्ध होती. मात्र रक्तातील घटक वेगळे करण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे रुग्णांना रक्तघटकांची आवश्यकता असल्यास, अन्य रक्तपेढ्या किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत होते. आता रक्तामधून प्लेटलेट्स, प्लाझ्मा व इतर घटकही वेगळे करता येणार आहेत.
राजावाडीत रक्तपेढीची सुविधा उपलब्ध होती. मात्र रक्तातील घटक वेगळे करण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे रुग्णांना रक्तघटकांची आवश्यकता असल्यास, अन्य रक्तपेढ्या किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत होते. आता रक्तामधून प्लेटलेट्स, प्लाझ्मा व इतर घटकही वेगळे करता येणार आहेत.