मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मुंबईतील नालेसफाईचा पैसा जर माझ्या खिशात गेला असा तुमचा आरोप असेल तर 'नमामि गंगे' योजनेसाठी ओतलेले करोडो रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खिशात गेले असे म्हणायचे का?, असा बोचरा सवाल आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 'नमामि गंगे' हे निव्वळ थोतांड आहे. हजारो कोटी खर्चूनही गंगेचा एकही थेंब स्वच्छ झालेला नाही, असेही उद्धव पुढे म्हणाले.
मुंबईतील बीकेसी मैदानात उद्धव ठाकरे यांनी दणक्यात सभा घेऊन प्रचाराची सांगता केली. आपल्या मॅरेथॉन भाषणात उद्धव यांनी मुंबई पालिकेने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना मुख्यमंत्र्यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. गर्दीअभावी रद्द करावी लागलेली मुख्यमंत्र्यांची पुण्यातील सभा, भाजपची जाहिरातबाजी आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था अशा सगळ्याच मुद्द्यांवरून उद्धव यांनी निशाणा साधला. 'मुंबईकरांची सेवा करूनच आम्ही मुंबई जिंकली आहे आणि आता बघाच २३ तारखेला मुंबईकर काय करतात ते', अशा शब्दांत उद्धव यांनी विजयाचा विश्वासही व्यक्त केला.
उद्धव काय म्हणाले?
- पुण्यातील मुख्यमंत्र्यांची सभा 'पारदर्शक' झाली. सभेला कुणीच नव्हतं म्हणून सभा रद्द करावी लागली.
- फडणवीस फक्त थापा मारत सुटले आहेत. लोक त्यांच्या भाषणांना कंटाळले आहेत.
- निवडणुकीनंतर शिवसेना दिसणार नाही, असं म्हणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांचं आज काय झालं आहे? आता देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची औकात काढली आहे. २३ तारखेला त्यांना शिवसेनेची औकात दिसेल.
- सीसीटीव्ही लावून मुंबई सुरक्षित राहणार हा भाजपचा दावा चुकीचा आहे. भिवंडीत जे घडलं ते मुख्यमंत्र्यांना दिसलं नाही कारण त्यांचं वायफाय बंद आहे.
- भिवंडीतील काँग्रेसचे सभागृहनेते मनोज म्हात्रे यांचा खून भाजपच्या तेथील उपाध्यक्षाने केला आहे. खुनी अजूनही फरार आहेत. सीसीटीव्हीत पुरावे आहेत. आरोपींना पकडून दाखवा. फाशी देऊ नका त्यांनी जसा खून केला तसेच त्यांना ठेचून मारा.
- भाजपने 'मेड फॉर इच अदर' जाहिरात मागे घेतली. भाजपलाच आता 'चल हट' म्हणण्याची वेळ आली आहे.
- शरद पवारांना पद्मविभूषण देऊ शकता तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अजून भारतरत्न का दिला नाही?
- ९२-९३ मध्ये मुंबई पेटली होती तेव्हा कुठे गेले होते भाजपवाले. फडणवीसजी तुमचं वय काय होतं तेव्हा?
- पंतप्रधान तुमचा, मुख्यमंत्री तुमचा, महापौर तुमचा, सरपंचही तुमचाच मग आम्ही काय तुमची धुणीभांडी करतच बसायचं का?
- मुंबईकरांसाठी आरोग्य कवच योजना मुख्यमंत्र्यांचे डोळे तपासून सुरू करणार.
- मुंबईत रस्ते विकास, नालेसफाई केली. आरोग्य सुविधा, व्हर्चुअल क्लासरूम, विद्यार्थ्यांचे पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी टॅब आम्ही पुरवले.
मुंबईतील नालेसफाईचा पैसा जर माझ्या खिशात गेला असा तुमचा आरोप असेल तर 'नमामि गंगे' योजनेसाठी ओतलेले करोडो रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खिशात गेले असे म्हणायचे का?, असा बोचरा सवाल आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 'नमामि गंगे' हे निव्वळ थोतांड आहे. हजारो कोटी खर्चूनही गंगेचा एकही थेंब स्वच्छ झालेला नाही, असेही उद्धव पुढे म्हणाले.
मुंबईतील बीकेसी मैदानात उद्धव ठाकरे यांनी दणक्यात सभा घेऊन प्रचाराची सांगता केली. आपल्या मॅरेथॉन भाषणात उद्धव यांनी मुंबई पालिकेने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना मुख्यमंत्र्यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. गर्दीअभावी रद्द करावी लागलेली मुख्यमंत्र्यांची पुण्यातील सभा, भाजपची जाहिरातबाजी आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था अशा सगळ्याच मुद्द्यांवरून उद्धव यांनी निशाणा साधला. 'मुंबईकरांची सेवा करूनच आम्ही मुंबई जिंकली आहे आणि आता बघाच २३ तारखेला मुंबईकर काय करतात ते', अशा शब्दांत उद्धव यांनी विजयाचा विश्वासही व्यक्त केला.
उद्धव काय म्हणाले?
- पुण्यातील मुख्यमंत्र्यांची सभा 'पारदर्शक' झाली. सभेला कुणीच नव्हतं म्हणून सभा रद्द करावी लागली.
- फडणवीस फक्त थापा मारत सुटले आहेत. लोक त्यांच्या भाषणांना कंटाळले आहेत.
- निवडणुकीनंतर शिवसेना दिसणार नाही, असं म्हणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांचं आज काय झालं आहे? आता देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची औकात काढली आहे. २३ तारखेला त्यांना शिवसेनेची औकात दिसेल.
- सीसीटीव्ही लावून मुंबई सुरक्षित राहणार हा भाजपचा दावा चुकीचा आहे. भिवंडीत जे घडलं ते मुख्यमंत्र्यांना दिसलं नाही कारण त्यांचं वायफाय बंद आहे.
- भिवंडीतील काँग्रेसचे सभागृहनेते मनोज म्हात्रे यांचा खून भाजपच्या तेथील उपाध्यक्षाने केला आहे. खुनी अजूनही फरार आहेत. सीसीटीव्हीत पुरावे आहेत. आरोपींना पकडून दाखवा. फाशी देऊ नका त्यांनी जसा खून केला तसेच त्यांना ठेचून मारा.
- भाजपने 'मेड फॉर इच अदर' जाहिरात मागे घेतली. भाजपलाच आता 'चल हट' म्हणण्याची वेळ आली आहे.
- शरद पवारांना पद्मविभूषण देऊ शकता तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अजून भारतरत्न का दिला नाही?
- ९२-९३ मध्ये मुंबई पेटली होती तेव्हा कुठे गेले होते भाजपवाले. फडणवीसजी तुमचं वय काय होतं तेव्हा?
- पंतप्रधान तुमचा, मुख्यमंत्री तुमचा, महापौर तुमचा, सरपंचही तुमचाच मग आम्ही काय तुमची धुणीभांडी करतच बसायचं का?
- मुंबईकरांसाठी आरोग्य कवच योजना मुख्यमंत्र्यांचे डोळे तपासून सुरू करणार.
- मुंबईत रस्ते विकास, नालेसफाई केली. आरोग्य सुविधा, व्हर्चुअल क्लासरूम, विद्यार्थ्यांचे पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी टॅब आम्ही पुरवले.