मुंबई:
जून आणि जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाठीसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी १५ नोव्हेंबरपासून लागू केलेली पाणीकपात मुंबई महापालिकेने मागे घेतली आहे. २० जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे.
मागील वर्षी २०१८ मध्ये पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबर २०१८ रोजी तलावांमधील पाण्याचा आढावा घेण्यात आला होता. तेव्हा तलाव पूर्ण भरलेले असताना वापरण्यायोग्य पाण्याचा उपलब्ध साठा एकूण साठ्यापेक्षा ९ टक्के इतका कमी होता. त्यामुळे १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबई शहरास होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली होती.
अलीकडेच १५ जुलै २०१९ रोजी पाणी साठ्याचा पुन्हा आढावा घेण्यात आला, तेव्हा एकूण पाणीसाठ्याच्या ४८ टक्के पाणीसाठी उपलब्ध असल्याचे आढळून आले. जून आणि जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. उर्वरित जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत सर्व तलाव पूर्ण भरतील अशी शक्यता आहे. परिणामी पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.
जून आणि जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाठीसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी १५ नोव्हेंबरपासून लागू केलेली पाणीकपात मुंबई महापालिकेने मागे घेतली आहे. २० जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे.
मागील वर्षी २०१८ मध्ये पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबर २०१८ रोजी तलावांमधील पाण्याचा आढावा घेण्यात आला होता. तेव्हा तलाव पूर्ण भरलेले असताना वापरण्यायोग्य पाण्याचा उपलब्ध साठा एकूण साठ्यापेक्षा ९ टक्के इतका कमी होता. त्यामुळे १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबई शहरास होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली होती.
अलीकडेच १५ जुलै २०१९ रोजी पाणी साठ्याचा पुन्हा आढावा घेण्यात आला, तेव्हा एकूण पाणीसाठ्याच्या ४८ टक्के पाणीसाठी उपलब्ध असल्याचे आढळून आले. जून आणि जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. उर्वरित जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत सर्व तलाव पूर्ण भरतील अशी शक्यता आहे. परिणामी पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.