अ‍ॅपशहर

संजय दत्त लवकर सुटलाच कसा?

अभिनेता संजय दत्त याच्यासमोरील अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच निघाल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्याची तुरुंगवासातून लवकर सुटका झाल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Maharashtra Times 13 Jun 2017, 6:07 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bombay hc asks maharashtra govt why was sanjay dutt released early
संजय दत्त लवकर सुटलाच कसा?


अभिनेता संजय दत्त याच्यासमोरील अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच निघाल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्याची तुरुंगवासातून लवकर सुटका झाल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारले आहे की, 'संजय दत्तची त्याच्या चांगल्या वागणुकीच्या आधारे लवकर सुटका करण्यात आली. पण संजय दत्त तर त्याच्या तुरुंगवासाच्या काळातला अर्धा वेळ पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता, मग त्याच्या वागणुकीचे मूल्यांकन कशाच्या आधारे करण्यात आले?' १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तला ५ वर्षांची शिक्षा झाली होती. खटला सुरू असताना तो जामिनावर होता. २०१३ मध्ये तो शरण आला होता. पुण्याच्या येरवडा तुरुंगातून त्याला शिक्षा पूर्ण होण्याआधी आठ महिने फेब्रुवारी २०१६ मध्ये जामीन मिळाला होता.

न्या. आर. एम. सावंत आणि साधना जाधव यांच्या खंडपीठानं पुण्याचे प्रदीप भालेकर यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी देताना संजय दत्तबद्दलचा प्रश्न उपस्थित केला आहे. संजय दत्त वर्षभरात ३ ते ४ वेळा बाहेर होता तर चांगल्या वर्तणुकीचं मूल्यांकन कशाच्या आधारे केलं तसंच हा निर्णय घेताना कोणती प्रक्रिया अवलंबली त्याचा तपशील द्या असा आदेश कोर्टानं राज्य सरकारला दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी एका आठवड्यानंतर आहे.

संजय दत्तला मुंबईच्या टाडा न्यायालयानं ३१ जुलै २००७ रोजी ६ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं ही शिक्षा कायम ठेवली, पण शिक्षेचा कालावधीत १ वर्षाने कमी केला. तुरुंगवासादरम्यान संजय दत्तला २०१३ मध्ये ९० दिवसांचा आणि नंतर ३० दिवसांचा पॅरोल मिळाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज