अ‍ॅपशहर

मौखिक साहित्याला लेखनाचे धुमारे

जगभरातील बोलीभाषा अस्तंगत होण्याची भीती असताना आदिवासी‌, भटके, विमुक्त यांच्यामध्ये अस्मितेचे भान येऊ लागले आहे. यातून या मौखिक साहित्याला हळुहळू लेखनाचे धुमारे फुटत आहेत. लहान प्रयत्नांमधून काही ठिकाणी पुस्तकनिर्मितीची वाटचाल होत आहे, मात्र व्यावसायिक गणित न जुळल्याने सरकारी यंत्रणेवरच अवलंबित्व आहे.

महाराष्ट्र टाइम्स 23 Apr 2019, 7:12 am
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi


जगभरातील बोलीभाषा अस्तंगत होण्याची भीती असताना आदिवासी‌, भटके, विमुक्त यांच्यामध्ये अस्मितेचे भान येऊ लागले आहे. यातून या मौखिक साहित्याला हळुहळू लेखनाचे धुमारे फुटत आहेत. लहान प्रयत्नांमधून काही ठिकाणी पुस्तकनिर्मितीची वाटचाल होत आहे, मात्र व्यावसायिक गणित न जुळल्याने सरकारी यंत्रणेवरच अवलंबित्व आहे.

भाषातज्ज्ञ गणेश देवी यांनी बोलीभाषांमधील पुस्तकांचे वास्तव सांगताना राज्यात गोंदी, पावरी, अहिराणी भाषेमध्ये पुस्तके निघत असल्याची माहिती दिली. राज्याबाहेर कर्नाटक, गुजरात, ईशान्य भारत, पश्चिम बंगालमध्येही पुस्तकनिर्मितीचे प्रयोग सुरू असल्याचे ते म्हणाले. आदिवासी साहित्य आता जोमाने पुढे येऊ लागले आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट या माध्यमातून या पुस्तकनिर्मितीला चालना मिळाली आहे. वीरा राठोड, उषाकिरण अत्राम, नजुबाई गावित, कुसुम आलाम, रंजना पावरा, वाहरू सोनावणे यांनी साहित्यनिर्मिती केली आणि त्याची प्रमाणित भाषेतील पुस्तके वाचणाऱ्या समाजामध्येही चर्चा झाली.

वीरा राठोड यांना पहिल्याच काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर बोलीभाषेत साहित्यनिर्मितीसाठी युवापिढीने उत्सुकता दाखवल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची कविता द्विभाषिक स्वरूपात बालभारतीच्या दहावीच्या पुस्तकातही समाविष्ट करण्यात आली आहे. (साहित्यप्रकारांना स्थान...६)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज