म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी काँग्रेस सोडताना विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेली जागा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढविण्याचे ठरविले असून या निवडणुकीत शिवसेनेची मदत घेण्यात येणार आहे. राणेंची कोंडी करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी ७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. राणे यांचा स्वाभिमानी पक्ष एनडीएत सामील झाला आहे. त्यामुळे राणे यांना या निवडणुकीची उमेदवारी भाजपच्यावतीने देण्यात येणार आहे. मात्र राणे यांना शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे भाजपची १२२ मते राणेंकडे आहेत. अपक्षांची मते राणेंना आणावी लागणार आहेत.
दुसरीकडे या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी उपस्थित होते. विखे पाटील यांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीत विधान परिषदेची निवडणूक एकत्र लढविण्याचे ठरले. काँग्रेसने विचारविनिमय करून उमेदवार द्यावा, असेही राष्ट्रवादीने सुचविले. तसेच राणे हे या निवडणुकीत उभे राहिले तर त्यांची कोंडी करण्यासाठी शिवसेनाही मदत करेल. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाशी संपर्क साधण्याचेही ठरले आहे. दोन दिवसांत काँग्रेस आपला उमेदवार निश्चित करणार आहे.
महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी काँग्रेस सोडताना विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेली जागा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढविण्याचे ठरविले असून या निवडणुकीत शिवसेनेची मदत घेण्यात येणार आहे. राणेंची कोंडी करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी ७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. राणे यांचा स्वाभिमानी पक्ष एनडीएत सामील झाला आहे. त्यामुळे राणे यांना या निवडणुकीची उमेदवारी भाजपच्यावतीने देण्यात येणार आहे. मात्र राणे यांना शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे भाजपची १२२ मते राणेंकडे आहेत. अपक्षांची मते राणेंना आणावी लागणार आहेत.
दुसरीकडे या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी उपस्थित होते. विखे पाटील यांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीत विधान परिषदेची निवडणूक एकत्र लढविण्याचे ठरले. काँग्रेसने विचारविनिमय करून उमेदवार द्यावा, असेही राष्ट्रवादीने सुचविले. तसेच राणे हे या निवडणुकीत उभे राहिले तर त्यांची कोंडी करण्यासाठी शिवसेनाही मदत करेल. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाशी संपर्क साधण्याचेही ठरले आहे. दोन दिवसांत काँग्रेस आपला उमेदवार निश्चित करणार आहे.