म. टा. प्रतिनिधी, मुंबई:
अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नसतानाही मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने जाहीर केलेली एलएलएमची परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला असला तरी तो पुरेसा नसल्याचा आक्षेप घेत काही विद्यार्थ्यांनी ही परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई विद्यापीठाने एलएलएम प्रवेशप्रक्रियेची चौथी यादी २७ डिसेंबर आणि पाचवी यादी १० जानेवारीला जाहीर केली. प्रवेशच वेळेवर झालेले नाहीत. ऑनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे लॉ अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नसल्याचे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही परीक्षा पुढे न ढकल्याने विद्यार्थ्यांनी थेट बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत काही दिवसांपूर्वी प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेतली होती.
या भेटीत त्यांनी वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेताना एलएलएमची परीक्षा आता २२ जानेवारीपासून घेण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. मात्र विद्यापीठाच्या या निर्णयाने एलएलएमच्या विद्यार्थ्यांचे समाधान झालेले नाही.
याबद्दल स्टुंडट लॉ कौन्सिलचे सचिन पवार म्हणाले की, केवळ पाच दिवसांत विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण होणे कठीण आहे. केवळ पाच दिवस वाढवून ही परीक्षा १७ जानेवारीऐवजी २२ जानेवारीपासून घेण्यात येणार आहे. या कालावधीत अभ्यास पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे या परीक्षेवरच बहिष्कार घालण्याचा निर्णय विद्यार्थी घेतील.
अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नसतानाही मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने जाहीर केलेली एलएलएमची परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला असला तरी तो पुरेसा नसल्याचा आक्षेप घेत काही विद्यार्थ्यांनी ही परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई विद्यापीठाने एलएलएम प्रवेशप्रक्रियेची चौथी यादी २७ डिसेंबर आणि पाचवी यादी १० जानेवारीला जाहीर केली. प्रवेशच वेळेवर झालेले नाहीत. ऑनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे लॉ अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नसल्याचे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही परीक्षा पुढे न ढकल्याने विद्यार्थ्यांनी थेट बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत काही दिवसांपूर्वी प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेतली होती.
या भेटीत त्यांनी वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेताना एलएलएमची परीक्षा आता २२ जानेवारीपासून घेण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. मात्र विद्यापीठाच्या या निर्णयाने एलएलएमच्या विद्यार्थ्यांचे समाधान झालेले नाही.
याबद्दल स्टुंडट लॉ कौन्सिलचे सचिन पवार म्हणाले की, केवळ पाच दिवसांत विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण होणे कठीण आहे. केवळ पाच दिवस वाढवून ही परीक्षा १७ जानेवारीऐवजी २२ जानेवारीपासून घेण्यात येणार आहे. या कालावधीत अभ्यास पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे या परीक्षेवरच बहिष्कार घालण्याचा निर्णय विद्यार्थी घेतील.