मुंबई: राज्य सरकारने राज्यातील करोनाच्या उद्रेकानंतर काही जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी नियंत्रण आल्याचे पाहून आज 'ब्रेक द चेन'अंतर्गत सुधारित नियमावली जारी केली आहे. यानुसार राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये नियमांमध्ये शिथिलता देत नागरिक,व्यापारी आणि दुकानदारांना दिलासा दिला आहे. तर ११ जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंधांत कोणतीही सूट दिलेली नाही. सरकारने २२ जिल्ह्यांना काही प्रमाणात शिथिलता दिली असली तरी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे मात्र बंदच ठेवण्यात आली आहेत. राज्यातील अनेक धार्मिक स्थळे, मंदिरे, ट्रस्टनी धार्मिक स्थळांना सर्व नियम पाळून सरू करण्याची विनंती राज्य सरकारला वारंवार केलेली आहे. मात्र, वाढत्या करोनाचा धोका लक्षात राज्य सरकारने धार्मिक स्थळांना हिरवा झेंडा दाखवण्याचा निर्णय घेतला नाही. आजही नवी नियमावली जाहीर करताना राज्य सरकारने जरी २२ जिल्ह्यांमध्ये काही नियम शिथिल केले असले तरी त्यातून सर्व धार्मिक स्थळांना मात्र वगळले आहे.
क्लिक करा आणि वाचा- 'या' ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम; पाहा, यात तुमचा जिल्हा आहे का?
हे नियम शिथिल करताना राज्य सरकारने सर्व प्रकारची दुकाने आणि मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. तर शनिवारी मात्र ही दुकाने आणि मॉल्स दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. रविवारी मात्र सर्व दुकाने आणि मॉल्स पूर्णपणे बंदच राहतील.
२२ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करताना सर्व सार्वजनिक उद्याने, खेळांची मैदाने, व्यायाम, चालणे, धावणे, सायकलिंद करणे आशांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्लिक करा आणि वाचा- आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील, मुंबई-ठाण्याचं काय?
राज्य सरकारने नवी नियमावली जारी करताना गर्दीची ठिकाणे बंद राखणे आणि आर्थिक व्यवहार सुरू ठेवून रोजगाराला चालना देणे अशा गोष्टींचा विशेष विचार केलेला दिसत आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद ठेवत असताना राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मॉल्समधील मल्टिप्लेक्स पूर्वी प्रमाणेच बंद राहणार आहेत. तसेच वाढदिवस समारंभ, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, मिरवणुका, निदर्शने, मोर्चे यांवर आजही बंदीच असणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- आज राज्याला मोठा दिलासा; मृत्यूंच्या संख्येत मोठी घट; दैनंदिन रुग्णसंख्याही झाली कमी
क्लिक करा आणि वाचा- 'या' ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम; पाहा, यात तुमचा जिल्हा आहे का?
हे नियम शिथिल करताना राज्य सरकारने सर्व प्रकारची दुकाने आणि मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. तर शनिवारी मात्र ही दुकाने आणि मॉल्स दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. रविवारी मात्र सर्व दुकाने आणि मॉल्स पूर्णपणे बंदच राहतील.
२२ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करताना सर्व सार्वजनिक उद्याने, खेळांची मैदाने, व्यायाम, चालणे, धावणे, सायकलिंद करणे आशांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्लिक करा आणि वाचा- आदेश जारी; राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील, मुंबई-ठाण्याचं काय?
राज्य सरकारने नवी नियमावली जारी करताना गर्दीची ठिकाणे बंद राखणे आणि आर्थिक व्यवहार सुरू ठेवून रोजगाराला चालना देणे अशा गोष्टींचा विशेष विचार केलेला दिसत आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद ठेवत असताना राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मॉल्समधील मल्टिप्लेक्स पूर्वी प्रमाणेच बंद राहणार आहेत. तसेच वाढदिवस समारंभ, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, मिरवणुका, निदर्शने, मोर्चे यांवर आजही बंदीच असणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- आज राज्याला मोठा दिलासा; मृत्यूंच्या संख्येत मोठी घट; दैनंदिन रुग्णसंख्याही झाली कमी