- वंचित बहुजन आघाडीवर बसप नाराज
- विदर्भात बसपला मानणारा वर्ग असल्याचा पक्षाचा दावा
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पार्टीने (बसप) २८८ विधानसभा मतदारसंघांत स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील दलित मुस्लिम, अन्य उपेक्षित समाजघटक आणि हिंदी भाषिक मतदारांमधील जनाधार कायम टिकवण्यासाठी 'एकला चलो रे' या भूमिकेतून सर्व जागा लढण्याचा निर्णय बसपने घेतला आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूर येथे बसपाच्या प्रदेश कार्यालयात रविवारी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. राज्यातील पक्षाच्या ३६ जिल्हाप्रमुखांनी आपापल्या भागातील विधानसभा मतदारसंघातून संभाव्य तीन उमेदवारांची नावे प्रदेशाला पाठवावीत, असे त्यांना सांगण्यात आल्याचे बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसपने अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाबरोबर आघाडी केली होती. सोलापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी बसप उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला होता. तथापि, ४३ लोकसभा मतदारसंघांत बसप उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.
यावेळी आम्ही २८८ जागांची तयारी सुरू केली आहे, असे राज्याचे प्रभारी व बसपचे राज्यसभा सदस्य अशोक सिद्धार्थ यांनी सांगितले. बसपच्या सर्वोसर्वा व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची आम्ही लवकरच भेट घेणार आहोत. त्यांनतर राज्यात इतर पक्षांबरोबर आघाडी करण्यासंदर्भात निर्णय होईल. बसप सर्व समाजगटांतील व्यक्तींना उमेदवारी देणार असल्याचे राजभर यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे बसपच्या उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली नाहीत. यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघात बसपाच्या उमेदवारांनी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. विदर्भात अनुसूचित जातीची सुमारे १५ टक्के लोकसंख्या असून, विदर्भात बसपला मानणारा वर्ग आहे. बसप आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात पारंपारिक मतदार आपल्याकडे खेचून आणण्यासाठी संघर्ष होईल असे दिसते.
- विदर्भात बसपला मानणारा वर्ग असल्याचा पक्षाचा दावा
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पार्टीने (बसप) २८८ विधानसभा मतदारसंघांत स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील दलित मुस्लिम, अन्य उपेक्षित समाजघटक आणि हिंदी भाषिक मतदारांमधील जनाधार कायम टिकवण्यासाठी 'एकला चलो रे' या भूमिकेतून सर्व जागा लढण्याचा निर्णय बसपने घेतला आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूर येथे बसपाच्या प्रदेश कार्यालयात रविवारी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. राज्यातील पक्षाच्या ३६ जिल्हाप्रमुखांनी आपापल्या भागातील विधानसभा मतदारसंघातून संभाव्य तीन उमेदवारांची नावे प्रदेशाला पाठवावीत, असे त्यांना सांगण्यात आल्याचे बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसपने अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाबरोबर आघाडी केली होती. सोलापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी बसप उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला होता. तथापि, ४३ लोकसभा मतदारसंघांत बसप उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.
यावेळी आम्ही २८८ जागांची तयारी सुरू केली आहे, असे राज्याचे प्रभारी व बसपचे राज्यसभा सदस्य अशोक सिद्धार्थ यांनी सांगितले. बसपच्या सर्वोसर्वा व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची आम्ही लवकरच भेट घेणार आहोत. त्यांनतर राज्यात इतर पक्षांबरोबर आघाडी करण्यासंदर्भात निर्णय होईल. बसप सर्व समाजगटांतील व्यक्तींना उमेदवारी देणार असल्याचे राजभर यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे बसपच्या उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली नाहीत. यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघात बसपाच्या उमेदवारांनी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. विदर्भात अनुसूचित जातीची सुमारे १५ टक्के लोकसंख्या असून, विदर्भात बसपला मानणारा वर्ग आहे. बसप आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात पारंपारिक मतदार आपल्याकडे खेचून आणण्यासाठी संघर्ष होईल असे दिसते.