अ‍ॅपशहर

'बाप कुठं मेला माहीत नाही, त्यांच्याकडं कागदपत्रं मागता?'

सुधारित नागरिकत्व कायदा व त्याअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या संभाव्य एनआरसीच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 'आजोबा, बाप कुठं मेला हे ज्यांना माहीत नाही, त्यांच्याकडं कागदपत्रं मागता काय,' असा सवाल आंबेडकर यांनी आज केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2022, 6:47 am
मुंबई: सुधारित नागरिकत्व कायदा व त्याअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या संभाव्य 'एनआरसी'च्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 'आजोबा, बाप कुठं मेला हे ज्यांना माहीत नाही, त्यांच्याकडं कागदपत्रं मागता काय,' असा सवाल आंबेडकर यांनी आज केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prakash ambedkar
'बाप कुठं मेला माहीत नाही, त्यांच्याकडं कागदपत्रं मागता?'


सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व एनआरसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीनं आज दादर येथे धरणं आंदोलन केलं. विविध समाजांचे लोक आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनातील सहभागींना संबोधित करताना आंबेडकर यांनी सीएए व एनआरसीच्या विरोधात मुद्देसूद मांडणी केली. सीएए व एनआरसी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा डाव आहे. हा डाव केवळ मुस्लिमांच्या विरोधात आहे असं नाही, तर ४० टक्के हिंदूंच्याही विरोधात आहे. आजही देशातील अनेकांचे संसार गाढवाच्या पाठीवर आहेत. त्यांच्याकडं कसलेही पुरावे नाहीत. बाप कुठं मेला? आजोबा कुठं मेला? हेही अनेकांना माहीत नाही. त्यांच्याकडून नागरिकत्वाचे पुरावे मागितले जाणार आहेत. हा अन्याय आहे. विचारपूर्वक केलेल्या या कायद्याला संघर्षानं उत्तर द्यावं लागणार आहे. हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन हा लढा लढायला हवा. डिटेन्शन कॅम्पमध्ये जायचं नसेल तर या सरकारविरोधात आवाज उठवा. हे सरकार पाडा,' असं आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केलं.
वाचा: सूर्याप्रमाणेच देशाला भाजप, आरएसएसचं ग्रहण लागलंय...

वाचा: निंदकांमुळेच कामाची ऊर्जा मिळतेः अण्णा हजारे

खारघर, नेरूळमध्ये डिटेन्शन कॅम्प

महाराष्ट्रात दोन ठिकाणी डिटेन्शन सेंटर असल्याचा गौप्यस्फोटही आंबेडकर यांनी यावेळी केला. नवी मुंबईत खारघरमध्ये दोन लाख लोक बसतील एवढं डिटेन्शन सेंटर आहे. आफ्रिकन ड्रग्ज तस्करांसाठी हे बांधलं गेल्याचं सांगितलं जातं. मात्र, इतके आफ्रिकन आरोपी तरी आहेत का,' असा प्रश्न आंबेडकरांनी केला. नेरूळला रेल्वे स्थानकाच्या बाजूलाही एक इमारत बांधण्यात आली आहे. ही समाज कल्याण खात्याची म्हणून दाखवली जात आहे. मात्र, ते डिटेन्शन सेंटरच आहे, असं ते म्हणाले.

वाचा: 'RSS चे पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलतात'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज