मुंबई : राज्याला प्रतीक्षा असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या अधूनमधून कानावर पडत असल्या तरी या बातम्यांमागे बहुतांशवेळा मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले आमदारच असतात, हे हे उघड गुपित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीला रवाना झाल्यानंतर लगेचच शिंदे यांच्या पक्षाचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी या संबंधीचे सूतोवाच करताना बैठकीनंतर विस्ताराचा निर्णय होणार असल्याचे वक्तव्य केले. प्रत्यक्षात संबंधित बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीच ही बैठक राज्यातील साखर उद्योगासंदर्भात असल्याचे स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर महिना, दोन महिन्यातच मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध इच्छुकांना लागतात. पहिल्या टप्प्यात ज्यांना संधी मिळाली नाही, ते आमदार सातत्याने विस्ताराची चर्चा करतात आणि ती घडवूनही आणतात. आपल्या पक्षाचे प्रमुख नेते दिल्लीला रवाना झाले की, ही सर्व मंडळी विस्ताराच्या बातम्या पसरवतात. अशा प्रकारच्या चर्चा करण्यामागे संबंधित नेत्यांवर दबाव यावा, हा प्रामुख्याने उद्देश असतो. मंगळवारीही अशाचप्रकराचा अनुभव आला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर लगेचच मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या चर्चिल्या जाऊ लागल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक पार झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लगेच येईल, असे वक्तव्य शिंदे यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांपुढे केले.
दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. सगळ्यांना विस्ताराची अपेक्षा आहे. त्यासाठीच राज्याचे दोन्ही नेते दिल्लीला रवाना झालेले आहेत. मी मंत्रिपदाची मागणी केलेली नाही, पण लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल, अशी चर्चा आहे. आजची बैठक झाल्यानंतर लगेच निर्णय होईल, असा दावाही गायकवाड यांनी केला. प्रत्यक्षात मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर संबंधित बैठकीवर भाष्य केले. 'आम्ही अमित शहा यांचे आभार मानतो. अतिशय तातडीची बैठक त्यांनी महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या संदर्भात घेतली. साखर उद्योगामध्ये असलेल्या अडचणी आणि त्यांना सशक्त करण्याच्या योजना यावर अतिशय सकारात्मक चर्चा झाली', अशी माहिती शिंदे यांनी दिली. 'केंद्रीय सहकारमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. आठवडाभरात चांगला निर्णय होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योजक, शेतकरी यांना सर्वांना दिलासा मिळेल. साखर उद्योग सक्षम झाला पाहिजे या उद्देशाने बैठक झाली', असे त्यांनी सांगितले. आता फक्त साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र यावर चर्चा झाली, असे सांगत शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नावर जास्त बोलणे टाळले. पत्रकारांच्या आग्रहानंतर मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल एवढीच मोजकी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर महिना, दोन महिन्यातच मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध इच्छुकांना लागतात. पहिल्या टप्प्यात ज्यांना संधी मिळाली नाही, ते आमदार सातत्याने विस्ताराची चर्चा करतात आणि ती घडवूनही आणतात. आपल्या पक्षाचे प्रमुख नेते दिल्लीला रवाना झाले की, ही सर्व मंडळी विस्ताराच्या बातम्या पसरवतात. अशा प्रकारच्या चर्चा करण्यामागे संबंधित नेत्यांवर दबाव यावा, हा प्रामुख्याने उद्देश असतो. मंगळवारीही अशाचप्रकराचा अनुभव आला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर लगेचच मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या चर्चिल्या जाऊ लागल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक पार झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लगेच येईल, असे वक्तव्य शिंदे यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांपुढे केले.
दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. सगळ्यांना विस्ताराची अपेक्षा आहे. त्यासाठीच राज्याचे दोन्ही नेते दिल्लीला रवाना झालेले आहेत. मी मंत्रिपदाची मागणी केलेली नाही, पण लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल, अशी चर्चा आहे. आजची बैठक झाल्यानंतर लगेच निर्णय होईल, असा दावाही गायकवाड यांनी केला. प्रत्यक्षात मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर संबंधित बैठकीवर भाष्य केले. 'आम्ही अमित शहा यांचे आभार मानतो. अतिशय तातडीची बैठक त्यांनी महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या संदर्भात घेतली. साखर उद्योगामध्ये असलेल्या अडचणी आणि त्यांना सशक्त करण्याच्या योजना यावर अतिशय सकारात्मक चर्चा झाली', अशी माहिती शिंदे यांनी दिली. 'केंद्रीय सहकारमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. आठवडाभरात चांगला निर्णय होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योजक, शेतकरी यांना सर्वांना दिलासा मिळेल. साखर उद्योग सक्षम झाला पाहिजे या उद्देशाने बैठक झाली', असे त्यांनी सांगितले. आता फक्त साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र यावर चर्चा झाली, असे सांगत शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नावर जास्त बोलणे टाळले. पत्रकारांच्या आग्रहानंतर मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल एवढीच मोजकी प्रतिक्रिया त्यांनी दिली.