म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मंगलबाई भागवत फाऊंडेशनतर्फे सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाणार आहे. या उपक्रमात मुंबईकर सहभागी होऊ इच्छित असल्यास त्यांनी आपली आर्थिक मदत पाठवण्याचे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी येथील कुटेवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते दहावीच्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना ही मदत दिली जाणार आहे. शाळेचे दप्तर, वह्या, कंपास, पेन, पेन्सिल, खोडरबर, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा दिला जाणार आहे. तसेच मुलींना सॅनिटरी नॅपकिन दिले जाणार आहेत. ज्यांना या उपक्रमासाठी आपले आर्थिक योगदान द्यायचे असेल त्यांनी वीणा भागवत यांच्याशी ९८२१५५२०५२ संपर्क करावा. भागवत त्यांना बँकेचा अकाऊंट नंबर व इतर तपशील देतील.