मुंबई: 'करोना'चा फैलाव वाढत असल्यानं व महाराष्ट्रात पहिला बळी गेल्याचं समोर आल्यानं चिंता वाढली आहे. 'करोना'चा सामना करण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde Tweet) यांनी सरकारला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 'काही दिवस मुंबई नियोजनपूर्वक बंद केली तर...? कदाचित संकट टळेल,' असं मत पंकजांनी मांडलं आहे.
करोना: शिर्डीत आता फक्त ऑनलाइन दर्शन
ट्विटरच्या माध्यमातून पंकजांनी 'करोना'च्या फैलावाबद्दल चिंता व्यक्त करतानाच काही उपायही सुचवले आहेत. 'व्यवस्थित नियोजन करून मुंबई बंद केली तर कदाचित करोनाच्या संकटाचा सामना करता येऊ शकतो. आधीच कल्पना दिल्यास लोक आवश्यक त्या गोष्टींचा साठा घरी करून ठेवू शकतील. मुंबईतील लोकल ट्रेन सात दिवस बंद राहिल्या तर लाखो लोकांना 'करोना'च्या विषाणूपासून दूर ठेवता येऊ शकते. दुकानं केवळ अति महत्त्वाच्या खरेदीसाठी उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी. कुठल्याही प्रकारच्या विंडो शॉपिंगला परवानगी देऊ नये. असा काही प्रयत्न करून पाहिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असं पंकजांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
वाचा: 'सरकारं पाडणाऱ्या विषाणूचा देशात धुमाकूळ'
गर्दी टाळणं हा करोना रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं राज्यभरात त्या दृष्टीनं उपाययोजना केल्या जात आहेत. राज्य सरकारनं मॉल, शाळा, महाविद्यालय अशा गर्दीच्या ठिकाणं बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, गावोगावच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील प्रमुख देवस्थानांनीही दर्शनासाठी मंदिरं बंद ठेवली आहेत. त्या अनुषंगानंच पंकजा मुंडे यांनी हा उपाय सुचवला आहे. पंकजा यांनी सुचवलेल्या या उपायावर अनेकांनी सहमतीही दर्शवली आहे.
वाचा: करोनाने घेतला क्रीडा क्षेत्रातील पहिला बळी
करोना: शिर्डीत आता फक्त ऑनलाइन दर्शन
ट्विटरच्या माध्यमातून पंकजांनी 'करोना'च्या फैलावाबद्दल चिंता व्यक्त करतानाच काही उपायही सुचवले आहेत. 'व्यवस्थित नियोजन करून मुंबई बंद केली तर कदाचित करोनाच्या संकटाचा सामना करता येऊ शकतो. आधीच कल्पना दिल्यास लोक आवश्यक त्या गोष्टींचा साठा घरी करून ठेवू शकतील. मुंबईतील लोकल ट्रेन सात दिवस बंद राहिल्या तर लाखो लोकांना 'करोना'च्या विषाणूपासून दूर ठेवता येऊ शकते. दुकानं केवळ अति महत्त्वाच्या खरेदीसाठी उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी. कुठल्याही प्रकारच्या विंडो शॉपिंगला परवानगी देऊ नये. असा काही प्रयत्न करून पाहिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असं पंकजांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
वाचा: 'सरकारं पाडणाऱ्या विषाणूचा देशात धुमाकूळ'
गर्दी टाळणं हा करोना रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं राज्यभरात त्या दृष्टीनं उपाययोजना केल्या जात आहेत. राज्य सरकारनं मॉल, शाळा, महाविद्यालय अशा गर्दीच्या ठिकाणं बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, गावोगावच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील प्रमुख देवस्थानांनीही दर्शनासाठी मंदिरं बंद ठेवली आहेत. त्या अनुषंगानंच पंकजा मुंडे यांनी हा उपाय सुचवला आहे. पंकजा यांनी सुचवलेल्या या उपायावर अनेकांनी सहमतीही दर्शवली आहे.
वाचा: करोनाने घेतला क्रीडा क्षेत्रातील पहिला बळी