मुंबई: निसर्ग चक्रीवादळ व पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं सर्व आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर, मुंबईकरांनाही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. पुढचे दोन दिवस वादळवाऱ्याचे असून पावसामुळं शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी दक्षता म्हणून कार चालकांनी चाकू किंवा तीक्ष्ण हत्यार सोबत ठेवावे. जेणेकरून गाडी पुरात अडकल्यास गाडीतून बाहेर पडण्यासाठी त्याची मदत होईल,' असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
Nisarga Live: मुंबईकरांसाठी महापालिकेकडून हेल्पलाइन जारी
मुंबईत आज निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या वादळाबरोबर मोठ्या पावसाची शक्यता आहे. हे दोन दिवस बाहेर पडणे टाळावे अशा सूचना महापालिकेनं आधीच दिल्या आहेत. मात्र, तरीही कुणाला बाहेर पडावेच लागले आणि छोट्या चारचाकीनं प्रवास करावा लागला तर तीक्ष्ण हत्यार सोबत ठेवावं, असं महापालिकेनं सांगितलं आहे. यापूर्वी चारचाकी गाड्या पुरात अडकून त्यांची लॉक सिस्टिम बंद झाल्यानं अनेकांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन ही सूचना करण्यात आली आहे. एखाद्या वेळेस गाडी पुराच्या पाण्यात अडकली आणि दरवाजे लॉक झाले तर तीक्ष्ण वस्तूच्या मदतीनं गाडीच्या काचा फोडून बाहेर पडता येईल, हा यामागचा उद्देश आहे. महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी मंगळवारी सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.
वाचा: 'निसर्ग'चा पहिला तडाखा! रत्नागिरीजवळ व्यापारी जहाज अडकले!
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं केलेल्या उपाययोजना
>> मुंबईतील ए विभाग, जी/दक्षिण, जी/उत्तर, एच/पश्चिम, के/पश्चिम, पी/उत्तर, आर/मध्य, आर/दक्षिण, आर/मध्य अशा पश्चिम किनारपट्टीवरील विभाग अधिकाऱ्यांमार्फत धोकादायक व समुद्र किनाऱ्यानजीकच्या वस्त्यांतील नागरिकांचे स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.
>> महापालिकेतर्फे सुमारे ३५ शाळा आतापर्यंत नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी निश्चित. नागरिकांना तेथे स्थलांतरित होण्याचे आवाहन
>> मुंबईतील ६ चौपाट्यांवर आतापर्यंत ९३ जीवरक्षक तैनात. रेस्क्यू बोट, जेट स्की आदी सज्ज
>> राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या एकूण ८ तुकड्या, नौदलाच्या ५ तुकड्या मुंबईत विविध ठिकाणी तैनात
>> एनडीआरएफची प्रत्येकी १ टीम कुलाबा (ए विभाग), वरळी (जी/दक्षिण), वांद्रे (एच/पूर्व), अंधेरी (के/पश्चिम) येथे ३ टीम, मालाड (पी/दक्षिण) आणि बोरिवली (आर/उत्तर) याप्रमाणे तैनात
>> आपत्कालिन स्थितीत मदत हवी असल्यास मुंबईकरांसाठी हेल्पलाइन. हेल्पलाइन क्रमांक १९१६ डायल करून त्यानंतर ४ दाबून आवश्यक ती मदत मागू शकतात.
>> महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्ष फक्त चक्रीवादळसंदर्भातील व्यवस्थापन करण्याकरीता स्थापन करण्यात आला आहे. पोलीस, अग्निशमन दल, बेस्ट, उद्याने विभाग, जनसंपर्क विभाग यांचे प्रतिनिधी समन्वय ठेवणार.
>> महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील ५ हजारापेक्षा अधिक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून घडामोडींवर नजर
>> पाणी साचण्याच्या संभाव्य ३०० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच, सहाही उदंचन केंद्रांवर (पंपिंग स्टेशन) पुरेसे मनुष्यबळ
>> धोकादायक इमारतींची पाहणी करुन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
>> वादळामुळे उन्मळून पडणाऱ्या झाडांना तातडीने हलविण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक विभागामध्ये ४ याप्रमाणे ९६ पथके तैनात
>> पावसाळापूर्व नालेसफाई कामांचा भाग म्हणून काढण्यात आलेला गाळ इतरत्र हलविण्याचे काम वेगाने सुरू
>> वादळवाऱ्यामुळे अडकून पडणाऱ्या वाहनांना टोईंग करण्याची व्यवस्था कार्यान्वित
>> अतिसंवेदनशील ठिकाणी तसेच रुग्णालयांमध्ये वीजेसाठी जनित्र (जनरेटर) उपलब्ध करण्याचे आदेश
>> कोरोना बाधितांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा योग्यरित्या मिळतील, याचीही पूर्णपणे काळजी घेण्याच्या सूचना
Nisarga Live: मुंबईकरांसाठी महापालिकेकडून हेल्पलाइन जारी
मुंबईत आज निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या वादळाबरोबर मोठ्या पावसाची शक्यता आहे. हे दोन दिवस बाहेर पडणे टाळावे अशा सूचना महापालिकेनं आधीच दिल्या आहेत. मात्र, तरीही कुणाला बाहेर पडावेच लागले आणि छोट्या चारचाकीनं प्रवास करावा लागला तर तीक्ष्ण हत्यार सोबत ठेवावं, असं महापालिकेनं सांगितलं आहे. यापूर्वी चारचाकी गाड्या पुरात अडकून त्यांची लॉक सिस्टिम बंद झाल्यानं अनेकांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन ही सूचना करण्यात आली आहे. एखाद्या वेळेस गाडी पुराच्या पाण्यात अडकली आणि दरवाजे लॉक झाले तर तीक्ष्ण वस्तूच्या मदतीनं गाडीच्या काचा फोडून बाहेर पडता येईल, हा यामागचा उद्देश आहे. महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी मंगळवारी सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.
वाचा: 'निसर्ग'चा पहिला तडाखा! रत्नागिरीजवळ व्यापारी जहाज अडकले!
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं केलेल्या उपाययोजना
>> मुंबईतील ए विभाग, जी/दक्षिण, जी/उत्तर, एच/पश्चिम, के/पश्चिम, पी/उत्तर, आर/मध्य, आर/दक्षिण, आर/मध्य अशा पश्चिम किनारपट्टीवरील विभाग अधिकाऱ्यांमार्फत धोकादायक व समुद्र किनाऱ्यानजीकच्या वस्त्यांतील नागरिकांचे स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.
>> महापालिकेतर्फे सुमारे ३५ शाळा आतापर्यंत नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी निश्चित. नागरिकांना तेथे स्थलांतरित होण्याचे आवाहन
>> मुंबईतील ६ चौपाट्यांवर आतापर्यंत ९३ जीवरक्षक तैनात. रेस्क्यू बोट, जेट स्की आदी सज्ज
>> राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या एकूण ८ तुकड्या, नौदलाच्या ५ तुकड्या मुंबईत विविध ठिकाणी तैनात
>> एनडीआरएफची प्रत्येकी १ टीम कुलाबा (ए विभाग), वरळी (जी/दक्षिण), वांद्रे (एच/पूर्व), अंधेरी (के/पश्चिम) येथे ३ टीम, मालाड (पी/दक्षिण) आणि बोरिवली (आर/उत्तर) याप्रमाणे तैनात
>> आपत्कालिन स्थितीत मदत हवी असल्यास मुंबईकरांसाठी हेल्पलाइन. हेल्पलाइन क्रमांक १९१६ डायल करून त्यानंतर ४ दाबून आवश्यक ती मदत मागू शकतात.
>> महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्ष फक्त चक्रीवादळसंदर्भातील व्यवस्थापन करण्याकरीता स्थापन करण्यात आला आहे. पोलीस, अग्निशमन दल, बेस्ट, उद्याने विभाग, जनसंपर्क विभाग यांचे प्रतिनिधी समन्वय ठेवणार.
>> महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील ५ हजारापेक्षा अधिक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून घडामोडींवर नजर
>> पाणी साचण्याच्या संभाव्य ३०० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच, सहाही उदंचन केंद्रांवर (पंपिंग स्टेशन) पुरेसे मनुष्यबळ
>> धोकादायक इमारतींची पाहणी करुन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
>> वादळामुळे उन्मळून पडणाऱ्या झाडांना तातडीने हलविण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक विभागामध्ये ४ याप्रमाणे ९६ पथके तैनात
>> पावसाळापूर्व नालेसफाई कामांचा भाग म्हणून काढण्यात आलेला गाळ इतरत्र हलविण्याचे काम वेगाने सुरू
>> वादळवाऱ्यामुळे अडकून पडणाऱ्या वाहनांना टोईंग करण्याची व्यवस्था कार्यान्वित
>> अतिसंवेदनशील ठिकाणी तसेच रुग्णालयांमध्ये वीजेसाठी जनित्र (जनरेटर) उपलब्ध करण्याचे आदेश
>> कोरोना बाधितांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा योग्यरित्या मिळतील, याचीही पूर्णपणे काळजी घेण्याच्या सूचना