म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
आगीपासून इमारती सुरक्षित राहाव्यात, यासाठी महाराष्ट्र अग्निसुरक्षा कायदा २००६नुसार अग्निशमन दलाने अग्निसुरक्षेची नियमावली तयार केली आहे. मात्र अनेक इमारती त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा हा कायदा धुडकावतात. कायद्याची अशी पायमल्ली करणाऱ्यांना अग्निशमन दलाने जोरदार दणका दिला आहे. मागील तीन वर्षांत तब्बल ३६ सोसायट्यांवर अग्निशमन दलाने न्यायालयात खटले दाखल केले आहेत.
तीन वर्षांपूर्वी काळबादेवी येथे गोकुळ हाऊस इमारतीला लागलेल्या आगीनंतर अग्निमशमन दलाने अग्निसुरक्षेसाठी कठोर पावले उचलली आहेत. नव्या, जुन्या प्रत्येक इमारतीला अग्निसुरक्षा यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच आपली इमारत किती सुरक्षित आहे याची पाहणी करण्यासाठी अग्निसुरक्षेचे ऑडिट सक्तीचे केले आहे. त्यासाठी अग्निशमन दलाने अचानक पाहणी मोहिमा देखील वारंवार राबवल्या. त्यानंतर अनेक सोसायट्यांना जाग येत अग्निसुरक्षेची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र त्यानंतरही काही सोसायट्या सुरक्षा कक्षेच्या बाहेर राहत असल्याचे आढळून आल्यानंतर अग्निशमन दलाने ही मोहीम तीव्र केली.
'अग्निशमन दलाने मागील तीन वर्षांत मुंबईतील ६१४२ इमारतींमधील अग्निशमन रोधक यंत्रणांची तपासणी केली असता, त्यामध्ये ३०८० इमारतींनी अग्निशमन यंत्रणेची पूर्तता पूर्ण केली असल्याचे व ३०६२ इमारतींना नोटिसा पाठवल्या आहेत', अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली आहे. ज्या इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यात अक्षम्य हलगर्जीपणा करण्यात आला आहे, अशा सर्व इमारतींना नोटिसा पाठवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
तपासणी - ६१४२
पूर्तता - ३०८०
नोटिसा - ३०६२
आगीपासून इमारती सुरक्षित राहाव्यात, यासाठी महाराष्ट्र अग्निसुरक्षा कायदा २००६नुसार अग्निशमन दलाने अग्निसुरक्षेची नियमावली तयार केली आहे. मात्र अनेक इमारती त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा हा कायदा धुडकावतात. कायद्याची अशी पायमल्ली करणाऱ्यांना अग्निशमन दलाने जोरदार दणका दिला आहे. मागील तीन वर्षांत तब्बल ३६ सोसायट्यांवर अग्निशमन दलाने न्यायालयात खटले दाखल केले आहेत.
तीन वर्षांपूर्वी काळबादेवी येथे गोकुळ हाऊस इमारतीला लागलेल्या आगीनंतर अग्निमशमन दलाने अग्निसुरक्षेसाठी कठोर पावले उचलली आहेत. नव्या, जुन्या प्रत्येक इमारतीला अग्निसुरक्षा यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच आपली इमारत किती सुरक्षित आहे याची पाहणी करण्यासाठी अग्निसुरक्षेचे ऑडिट सक्तीचे केले आहे. त्यासाठी अग्निशमन दलाने अचानक पाहणी मोहिमा देखील वारंवार राबवल्या. त्यानंतर अनेक सोसायट्यांना जाग येत अग्निसुरक्षेची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र त्यानंतरही काही सोसायट्या सुरक्षा कक्षेच्या बाहेर राहत असल्याचे आढळून आल्यानंतर अग्निशमन दलाने ही मोहीम तीव्र केली.
'अग्निशमन दलाने मागील तीन वर्षांत मुंबईतील ६१४२ इमारतींमधील अग्निशमन रोधक यंत्रणांची तपासणी केली असता, त्यामध्ये ३०८० इमारतींनी अग्निशमन यंत्रणेची पूर्तता पूर्ण केली असल्याचे व ३०६२ इमारतींना नोटिसा पाठवल्या आहेत', अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली आहे. ज्या इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यात अक्षम्य हलगर्जीपणा करण्यात आला आहे, अशा सर्व इमारतींना नोटिसा पाठवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
तपासणी - ६१४२
पूर्तता - ३०८०
नोटिसा - ३०६२