अ‍ॅपशहर

मुंबई विद्यापीठाची विभागांमुळे वाताहत

केंद्र सरकारने शैक्षणिक संस्थांच्या दर्जात्मक सुधारणेसाठी 'नॅक' मूल्यांकनाला विशेष महत्त्व दिले आहे. मुंबई विद्यापीठाकडे हे मूल्यांकन नसल्यामुळे दूर व मुक्त शिक्षण संस्थेचे (आयडॉल) अस्तित्व धोक्यात आले होते. तरीही 'नॅक' मूल्यांकनाची मुदत संपून दीड वर्ष उलटले

Maharashtra Times 23 Nov 2018, 4:52 am
- शैक्षणिक संस्थांच्या दर्जात्मक सुधारणेसाठी 'नॅक' मूल्यांकनाला महत्त्व
महाराष्ट्र टाइम्स.कॉम casualties due to departments
मुंबई विद्यापीठाची विभागांमुळे वाताहत


- मुदत संपून दीड वर्ष उलटले तरी विद्यापीठाकडून अर्ज नाही

- अनेक विभागांकडून तपशील देण्यास दिरंगाई झाल्याची माहिती

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

केंद्र सरकारने शैक्षणिक संस्थांच्या दर्जात्मक सुधारणेसाठी 'नॅक' मूल्यांकनाला विशेष महत्त्व दिले आहे. मुंबई विद्यापीठाकडे हे मूल्यांकन नसल्यामुळे दूर व मुक्त शिक्षण संस्थेचे (आयडॉल) अस्तित्व धोक्यात आले होते. तरीही 'नॅक' मूल्यांकनाची मुदत संपून दीड वर्ष उलटले तरी अद्याप मूल्यांकनासाठी अर्ज करण्यात आलेला नाही. सध्या विद्यापीठ स्तरावर युद्धपातळीवर ही प्रक्रिया सुरू असली तरी अनेक विभागांकडून माहिती न आल्यामुळे ती रेंगाळत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नॅक मूल्यांकनाची मुदत २० एप्रिल २०१७ रोजी संपूनही मुंबई विद्यापीठाने त्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. परिणामी देशातील जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेले मुंबई विद्यापीठ नऊ महिन्यांपासून नॅक मूल्यांकनाविना आहे. मुदत संपण्यापूर्वीच विद्यापीठाने नवीन मूल्यांकनासाठी अर्ज करणे अपेक्षित होते. मात्र १ एप्रिलपासून मूल्यांकनाची प्रक्रिया बदलली. ती अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत असल्याचे सांगत मुंबई विद्यापीठाने एप्रिल, २०१७नंरच्या प्रणालीनुसार मूल्यांकन करून घेण्याचा निर्णय घेत 'नॅक'साठी अर्ज करणे टाळले होते. यानंतर मूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र त्यामध्ये विद्यापीठ अर्ज करू शकले नाही.

दरम्यानच्या काळात डॉ. सुहास पेडणेकर यांची कुलगुरुपदी नियुक्ती झाली. नव्या प्रणालीमध्ये परीक्षणासाठी संस्थात्मक माहिती (आयआयक्यूए) आणि स्वयंअभ्यास अहवाल (एसएसआर) दाखल करावे लागणार आहेत. हे मूल्यांकन करताना अभ्यासक्रम, शिक्षक प्रशिक्षण, संशोधन, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांचे पाठबळ, नेतृत्व आणि व्यवस्थापन, संस्थेतील चांगले उपक्रम या बाबींचा विचार केला जातो. या सर्वांसाठी विद्यापीठाकडून चांगला अहवाल 'नॅक'कडे जाणे अपेक्षित असते. यासाठी विद्यापीठाने याची जबाबदारी 'इंटरनल क्वालिटी अॅशुरन्स सेल'कडे (आयक्यूएसी) सोपवली. यानुसार या कक्षाने सर्व विभागांकडून माहिती मागवली असून, यात विभागांनी केलेले संशोधन, भरती तसेच त्यांच्या कामगिरीचा संपूर्ण आढावा ऑनलाइन मागवला आहे. ही माहिती आल्यावर त्याचे संकलन करून अहवाल सादर केला जाणार आहे. मात्र काही विभागांनी वेळेवर माहिती न दिल्याने ही प्रक्रिया रखडली असल्याचे सूत्रांकडून समजते.

काम अंतिम टप्प्यात

'नॅक'च्या नवीन प्रणालीनुसार विद्यापीठाने सर्व माहितीचे संकलन केले आहे. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने माहितीचे विश्लेषण, एकीकरण आणि प्रमाणिकरणाचे काम प्रगतीपथावर असून, स्वयंम मूल्यांकन अहवाल तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे विद्यापीठाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज