म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून ९ लाख ६३ हजार लशींचा पुरवठा करण्यात आला आहे. मुंबईमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या लशींची संख्या ही १ लाख ३९ हजार इतकी आहे. तरीही ही संख्या पुरेशी नसल्याचा सूर विविध क्षेत्रातून व्यक्त होत होता. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. नोंदणी झालेल्या व त्यापुढील टप्प्यात लसीकरणासाठी योग्य असलेल्या प्रत्येकाला लस मिळेल. केंद्र सरकारने तसे लेखी आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. सिरमकडून राज्याला ९.८३ लाख लशीचे डोस मिळाले आहेत. तर 'भारत बायोटेक'कडून २० हजार लशींचे डोस येणार आहेत. लसीकरणाच्या पुढील टप्प्यामध्ये गरजेनुसार ही उपलब्धता होणार आहे, असे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या लशीच्या एका वायलमध्ये १० डोस असतील. ते दहा जणांना देता येतील. एक वायल उघडल्यानंतर चार तासांमध्ये ते द्यावे लागणार आहे. प्रत्येक डोस हा ०.५ मिली असण्याची शक्यता आहे. लसीकरणाच्या संदर्भातील विस्तृत नियमावली रात्री उशिरापर्यंत केंद्र सरकारकडून प्राप्त झाली नव्हती. १५ जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व केंद्रांमध्ये लशींची उपलब्धता होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील संबधित आरोग्ययंत्रणेच्या गाड्या त्या ठिकाणी जातील. मुंबईतील पालिका आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम सुरू होती. केईएम रुग्णालयामध्ये कोव्हिशिल्ड लशीच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्यांना लसीकरणाचा अनुभव मिळालेला आहे. यापूर्वी 'इंद्रधनु'सारख्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्यामुळे प्रौढ लसीकरणामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास डॉ. हेमंत देशमुख यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी लसीकरणाच्या संदर्भातील सर्व प्रक्रिया ही सुरळीत पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला. केंद्र सरकारने लसीकरण सर्वांना करण्यात येईल अशी लेखी हमी दिली आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दुष्परिणामांवरही लक्ष
'मटा'ने यापूर्वी लशीची परिणामकारकता लक्षात घेण्यासाठी दुष्परिणामांबद्दल चर्चा करण्याची गरज व्यक्त केली होती. राज्य सरकारने लसीकरणामध्ये निर्माण होणाऱ्या दुष्परिणामांचे वैद्यकीय विश्लेषण करण्यासाठी काही रुग्णालयांची विशेषत्वाने निवड केली आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या वैद्यकीय समस्या हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून अशी परिस्थिती ओढावल्यास संबधित रुग्णालयांमध्ये राखीव खाटाही ठेवण्यात आल्या आहे.
राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून ९ लाख ६३ हजार लशींचा पुरवठा करण्यात आला आहे. मुंबईमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या लशींची संख्या ही १ लाख ३९ हजार इतकी आहे. तरीही ही संख्या पुरेशी नसल्याचा सूर विविध क्षेत्रातून व्यक्त होत होता. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. नोंदणी झालेल्या व त्यापुढील टप्प्यात लसीकरणासाठी योग्य असलेल्या प्रत्येकाला लस मिळेल. केंद्र सरकारने तसे लेखी आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. सिरमकडून राज्याला ९.८३ लाख लशीचे डोस मिळाले आहेत. तर 'भारत बायोटेक'कडून २० हजार लशींचे डोस येणार आहेत. लसीकरणाच्या पुढील टप्प्यामध्ये गरजेनुसार ही उपलब्धता होणार आहे, असे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या लशीच्या एका वायलमध्ये १० डोस असतील. ते दहा जणांना देता येतील. एक वायल उघडल्यानंतर चार तासांमध्ये ते द्यावे लागणार आहे. प्रत्येक डोस हा ०.५ मिली असण्याची शक्यता आहे. लसीकरणाच्या संदर्भातील विस्तृत नियमावली रात्री उशिरापर्यंत केंद्र सरकारकडून प्राप्त झाली नव्हती. १५ जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व केंद्रांमध्ये लशींची उपलब्धता होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील संबधित आरोग्ययंत्रणेच्या गाड्या त्या ठिकाणी जातील. मुंबईतील पालिका आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम सुरू होती. केईएम रुग्णालयामध्ये कोव्हिशिल्ड लशीच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्यांना लसीकरणाचा अनुभव मिळालेला आहे. यापूर्वी 'इंद्रधनु'सारख्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्यामुळे प्रौढ लसीकरणामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास डॉ. हेमंत देशमुख यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी लसीकरणाच्या संदर्भातील सर्व प्रक्रिया ही सुरळीत पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला. केंद्र सरकारने लसीकरण सर्वांना करण्यात येईल अशी लेखी हमी दिली आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दुष्परिणामांवरही लक्ष
'मटा'ने यापूर्वी लशीची परिणामकारकता लक्षात घेण्यासाठी दुष्परिणामांबद्दल चर्चा करण्याची गरज व्यक्त केली होती. राज्य सरकारने लसीकरणामध्ये निर्माण होणाऱ्या दुष्परिणामांचे वैद्यकीय विश्लेषण करण्यासाठी काही रुग्णालयांची विशेषत्वाने निवड केली आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या वैद्यकीय समस्या हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून अशी परिस्थिती ओढावल्यास संबधित रुग्णालयांमध्ये राखीव खाटाही ठेवण्यात आल्या आहे.