म. टा. प्रतिनिधी, मुंबई
आप्तस्वकीयांना रेल्वे स्थानकावर सोडायला जाणे नागरिकांना आता महागात पडणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सात रेल्वे स्थनाकातील फलाट तिकीट १० रुपयांवरून थेट ५० रुपये करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. उन्हाळी गर्दी वाढू लागल्याने प्रवाशांव्यतिरिक्तच्या नागरिकांना अटकाव करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, पनवेल, कल्याण, ठाणे आणि भिवंडी रोड या स्थानकातील फलाट तिकिटांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पूर्वी फलाट तिकीट १० रुपये होते. यात आता पाच पट वाढ करण्यात आली आहे.
करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाल्याने, नागरिक प्रवासासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले आहेत. यामुळे सीएसएमटी, एलटीटी स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत आहे. विशेषतः एमएमआरमधून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. मुंबईत वाढत्या करोना रुग्ण संख्येमुळे गर्दी टाळण्याची, तसेच गर्दी नियोजनाच्या उपाययोजना करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
फलाट तिकिटांच्या दरवाढीतून कमाई करणे हा हेतू नाही. रेल्वे स्थानकातील गर्दी निवारण्यासाठी आणि प्रवासी वगळता अन्य नागरिकांना फलाट प्रवेश नाकारण्यासाठी फलाट तिकीट दरांत वाढ करण्यात आली असून, ही वाढ लागू करण्यात आलेली आहे, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेवरील स्थानकांत फलाट तिकीट दर जैसे थे राहणार आहे. कोणत्याही पद्धतीची नवीन वाढ करण्यात आलेली नाही, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.
लोकल तिकिटांवर आढळल्यास...
निवडक रेल्वे स्थानकांवर फलाट तिकीट ५० रुपये आहे. ५० रुपये वाचवण्यासाठी जवळच्या रेल्वे स्थानकांतील तिकीट काढून मेल-एक्सप्रेस फलाटांवर वावरणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे. असे तिकीट काढणारा प्रवासी विनातिकीट मानून तिकीट तपासणीस त्यांच्यावर कारवाई करतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आप्तस्वकीयांना रेल्वे स्थानकावर सोडायला जाणे नागरिकांना आता महागात पडणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सात रेल्वे स्थनाकातील फलाट तिकीट १० रुपयांवरून थेट ५० रुपये करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. उन्हाळी गर्दी वाढू लागल्याने प्रवाशांव्यतिरिक्तच्या नागरिकांना अटकाव करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, पनवेल, कल्याण, ठाणे आणि भिवंडी रोड या स्थानकातील फलाट तिकिटांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पूर्वी फलाट तिकीट १० रुपये होते. यात आता पाच पट वाढ करण्यात आली आहे.
करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाल्याने, नागरिक प्रवासासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले आहेत. यामुळे सीएसएमटी, एलटीटी स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत आहे. विशेषतः एमएमआरमधून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. मुंबईत वाढत्या करोना रुग्ण संख्येमुळे गर्दी टाळण्याची, तसेच गर्दी नियोजनाच्या उपाययोजना करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
फलाट तिकिटांच्या दरवाढीतून कमाई करणे हा हेतू नाही. रेल्वे स्थानकातील गर्दी निवारण्यासाठी आणि प्रवासी वगळता अन्य नागरिकांना फलाट प्रवेश नाकारण्यासाठी फलाट तिकीट दरांत वाढ करण्यात आली असून, ही वाढ लागू करण्यात आलेली आहे, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेवरील स्थानकांत फलाट तिकीट दर जैसे थे राहणार आहे. कोणत्याही पद्धतीची नवीन वाढ करण्यात आलेली नाही, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.
लोकल तिकिटांवर आढळल्यास...
निवडक रेल्वे स्थानकांवर फलाट तिकीट ५० रुपये आहे. ५० रुपये वाचवण्यासाठी जवळच्या रेल्वे स्थानकांतील तिकीट काढून मेल-एक्सप्रेस फलाटांवर वावरणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे. असे तिकीट काढणारा प्रवासी विनातिकीट मानून तिकीट तपासणीस त्यांच्यावर कारवाई करतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.