मुंबई:
लोकलच्या वेळेशी मुंबईकरांचा दिनक्रम बांधलेला असतो. त्यामुळे लोकल वेळेवर धावणे सर्वांसाठीच आवश्यक असते. मात्र निदान मध्य रेल्वेच्या बाबतीत तरी तसे होताना दिसत नाही. पश्चिम रेल्वे सेवा देण्यात अग्रभागी असताना मध्य रेल्वेने वक्तशीरपणात नेहमीप्रमाणे तळ गाठला आहे. मध्य, हार्बर, ट्रान्सहार्बरचा व्याप मोठा आहे. त्यामुळे या मार्गावर वारंवार तांत्रिक अडचणी उद्भवतात. परिणामी लोकलचे वेळापत्रक कोलमडते. मध्य रेल्वेचा १८ ते २४ जूनदरम्यान वक्तशीरपणा अवघा ५८ टक्के असतानाच पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा तब्बल ९४.२१ टक्के होता.
मध्य रेल्वेवर कायमच निर्माण होणाऱ्या गोंधळामुळे प्रवासी संतापलेले असतात. दुसरीकडे पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा सर्वोत्तम कामगिरीचा भाग ठरला आहे. यापूर्वीच लांबपल्ल्यांच्या गाड्या उशिराने धावत असल्याबद्दल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी झाडाझडती घेतली होती. अशातच, १४ ते १८ जून कालावधीतील मध्य रेल्वेवरील उशिराने धावणाऱ्या लोकलनी प्रशासनाले चिंतेत टाकले आहे.
लांबपल्ल्याच्या गाड्यांमुळे होतो उशीर
मध्य रेल्वेवर दररोज लोकलच्या १७३२ फेऱ्या चालतात. त्यासह लांबपल्ल्यांच्या गाड्यांची संख्या १९० आहे. त्यात मालगाड्यांची वेगळी भर पडते. अशातच उत्तरेकडून येणाऱ्या गाड्या अनेकदा पाच ते सहा तास उशिराने धावतात. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथे स्वच्छता वा इगतपुरी येथे पाणी भरण्यासाठी थांबून पाच मिनिटांसाठी उशिराने धावल्यास त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या सेवेवर होत असल्याचे अधिकारी स्पष्ट करतात.
वक्तशीरपणाला उतरती कळा
मध्य रेल्वेची गतवर्षी जूनमधील कामगिरी पडताळून पाहिली असता तेव्हाचा वक्तशीरपणा ६८ टक्के इतका होता. पण यंदा त्यात वाढ होण्याऐवजी घटच झाली आहे. त्याचवेळी पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वक्तशीरपणा ९४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे देशातील पहिल्या १० विभागांमध्ये पश्चिम रेल्वेची वर्णी लागली आहे.
लोकलच्या वेळेशी मुंबईकरांचा दिनक्रम बांधलेला असतो. त्यामुळे लोकल वेळेवर धावणे सर्वांसाठीच आवश्यक असते. मात्र निदान मध्य रेल्वेच्या बाबतीत तरी तसे होताना दिसत नाही. पश्चिम रेल्वे सेवा देण्यात अग्रभागी असताना मध्य रेल्वेने वक्तशीरपणात नेहमीप्रमाणे तळ गाठला आहे. मध्य, हार्बर, ट्रान्सहार्बरचा व्याप मोठा आहे. त्यामुळे या मार्गावर वारंवार तांत्रिक अडचणी उद्भवतात. परिणामी लोकलचे वेळापत्रक कोलमडते. मध्य रेल्वेचा १८ ते २४ जूनदरम्यान वक्तशीरपणा अवघा ५८ टक्के असतानाच पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा तब्बल ९४.२१ टक्के होता.
मध्य रेल्वेवर कायमच निर्माण होणाऱ्या गोंधळामुळे प्रवासी संतापलेले असतात. दुसरीकडे पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा सर्वोत्तम कामगिरीचा भाग ठरला आहे. यापूर्वीच लांबपल्ल्यांच्या गाड्या उशिराने धावत असल्याबद्दल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी झाडाझडती घेतली होती. अशातच, १४ ते १८ जून कालावधीतील मध्य रेल्वेवरील उशिराने धावणाऱ्या लोकलनी प्रशासनाले चिंतेत टाकले आहे.
लांबपल्ल्याच्या गाड्यांमुळे होतो उशीर
मध्य रेल्वेवर दररोज लोकलच्या १७३२ फेऱ्या चालतात. त्यासह लांबपल्ल्यांच्या गाड्यांची संख्या १९० आहे. त्यात मालगाड्यांची वेगळी भर पडते. अशातच उत्तरेकडून येणाऱ्या गाड्या अनेकदा पाच ते सहा तास उशिराने धावतात. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथे स्वच्छता वा इगतपुरी येथे पाणी भरण्यासाठी थांबून पाच मिनिटांसाठी उशिराने धावल्यास त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या सेवेवर होत असल्याचे अधिकारी स्पष्ट करतात.
वक्तशीरपणाला उतरती कळा
मध्य रेल्वेची गतवर्षी जूनमधील कामगिरी पडताळून पाहिली असता तेव्हाचा वक्तशीरपणा ६८ टक्के इतका होता. पण यंदा त्यात वाढ होण्याऐवजी घटच झाली आहे. त्याचवेळी पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वक्तशीरपणा ९४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे देशातील पहिल्या १० विभागांमध्ये पश्चिम रेल्वेची वर्णी लागली आहे.