अ‍ॅपशहर

भुजबळ पुन्हा सक्रिय; देशभर दौरा करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना आज केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून घरी येताच भुजबळ यांनी घरी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याचं सांगितलं. रुग्णालयातील सर्व तपासण्यापूर्ण झाल्यावर नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात फिरणार असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 May 2018, 1:36 pm
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना आज केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून घरी येताच भुजबळ यांनी घरी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याचं सांगितलं. रुग्णालयातील सर्व तपासण्यापूर्ण झाल्यावर नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात फिरणार असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chagan-bhujbal2


आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर सुटका झाल्यानंतरही छगन भुजबळ रुग्णालयातच होते. त्यांना आज डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर आज तब्बल दोन वर्षानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आरोग्याची तक्रार अजूनही संपलेली नाही. काही चाचण्यापूर्ण झाल्यानंतर पुन्हा देशभर फिरणार आहे. राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं. ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या नावाखाली मला तुरुंगात टाकण्यात आलं. त्या महाराष्ट्र सदनचा सर्वचजण लाभ घेत आहेत. त्याचा मला आनंदच आहे. भाजपच्या खासदारानेही 'महाराष्ट सदन सुंदर और बनानेवाला अंदर', अशी प्रतिक्रिया देऊन कामाला दाद दिली होती, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली.

'मातोश्री'चा पडत्या काळात हात

पडत्या काळात अनेकांनी मदतीचा हात दिला. दोन शब्द चांगले बोलले. शिवसेनाही माझ्याबद्दल चांगली बोलली होती. त्यामुळे पंकज मातोश्रीवर गेले होते. आभार मानण्यासाठी गेले होते. २५ वर्ष माझा शिवसेनेशी स्नेह होता. त्यामुळे ऋणानुबंध आहेतच, असंही भुजबळ म्हणाले.


पहिला फोन पवारांचा

मला जामीन मिळाला त्या दिवशी पहिला फोन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आला होता, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भुजबळ यांनी खास त्यांच्याच शैलीत पत्रकारांच्या प्रश्नांची मिश्किलपणे उत्तरे दिली. तुरुंगातील अनुभव कसा होता? असा प्रश्न एका पत्रकाराने त्यांना विचारला. त्यावर 'जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे', असं मिश्किल भाष्य त्यांनी केलं. राजकारणात अशा गोष्टी होतच असतात. सगळे ढग हळूहळू दूर होतील. सत्य लवकरच बाहेर येईल. पण तुम्ही सुद्धा सत्य शोधायला हवं होतं. अनेकांनी या प्रकरणाचा आपआपल्या पद्धतीने अर्थ लावला. हत्तीची सोंड जशी दिसली तसं भाष्य केलं, असं ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज