शिवसेनेचा भाजपवर निशाणा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
नालेसफाईच्या कामावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा सुरू झाला असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे यांचा नालेपाहणीचा दौरा म्हणजे कंत्राटदारांना क्लीन चिट असल्याचा आरोप भाजपने केल्यानंतर सेनेने कंत्राटदार नेमण्याचे काम प्रशासन करत असून यंदा पावसाळ्यात मुंबई तुंबल्यास पावसाळ्यात मुंबई तुंबली तर पहिल्यांदा मुख्यमंत्री, नंतर पालिका आयुक्त आणि त्यानंतर शिवसेना जबाबदार राहाणार असल्याचा पलटवार केला आहे.
नालेसफाईच्या कामात भाजप १०० टक्के असमाधानी असल्याचा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला आहे. भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेना नेते अनिल परब यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. उद्धव ठाकरे हे प्रत्येक वर्षी नालेसफाईची पाहणी करतात. यावर्षीच आशीष शेलार यांना हा दौरा का खटकला, असा सवाल परब यांनी केला आहे. मुंबई तुंबणार नाही असे वचन उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना दिले आहे. त्यामुळे नालेसफाईची पाहणी केली तर त्यात गैर काय? शेलार यांच्या प्रमाणपत्राची शिवसेनेला गरज नाही, असे परब यांनी सुनावले आहे.
पाणी तुंबल्यास आयुक्तांवर कारवाई करा
उद्धव ठाकरे यांचा दौरा कंत्राटदारांना क्लीन चिट देण्यासाठी नव्हता. सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेना नालेसफाईचे कंत्राटदार नेमत नाही. कंत्राटदार प्रशासन नेमते मग प्रशासन भ्रष्ट आहे का, असा प्रश्न परब यांनी विचारला आहे. प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करत असते. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबल्यास मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी सेनेने केली आहे.
जे. कुमार नागपुरमध्ये कसा चालतो?
आशीष शेलार मुंबई जिंकू शकले नाहीत म्हणून ते शिवसेनेवर विनाकारण आरोप करत आहेत, असा दावा करत नालेसफाई करणारे कंत्राटदार काळ्या यादीत आहेत, हे भाजपला आधी माहिती नव्हते का? जे. कुमार हा कंत्राटदार मुंबई पालिकेत काळ्या यादीत आहे पण तो नागपूर पालिकेत काम करतो आहे. याला जबाबदार कोण, अशी विचारणा परब यांनी केली आहे.
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
नालेसफाईच्या कामावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा सुरू झाला असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे यांचा नालेपाहणीचा दौरा म्हणजे कंत्राटदारांना क्लीन चिट असल्याचा आरोप भाजपने केल्यानंतर सेनेने कंत्राटदार नेमण्याचे काम प्रशासन करत असून यंदा पावसाळ्यात मुंबई तुंबल्यास पावसाळ्यात मुंबई तुंबली तर पहिल्यांदा मुख्यमंत्री, नंतर पालिका आयुक्त आणि त्यानंतर शिवसेना जबाबदार राहाणार असल्याचा पलटवार केला आहे.
नालेसफाईच्या कामात भाजप १०० टक्के असमाधानी असल्याचा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला आहे. भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेना नेते अनिल परब यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. उद्धव ठाकरे हे प्रत्येक वर्षी नालेसफाईची पाहणी करतात. यावर्षीच आशीष शेलार यांना हा दौरा का खटकला, असा सवाल परब यांनी केला आहे. मुंबई तुंबणार नाही असे वचन उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना दिले आहे. त्यामुळे नालेसफाईची पाहणी केली तर त्यात गैर काय? शेलार यांच्या प्रमाणपत्राची शिवसेनेला गरज नाही, असे परब यांनी सुनावले आहे.
पाणी तुंबल्यास आयुक्तांवर कारवाई करा
उद्धव ठाकरे यांचा दौरा कंत्राटदारांना क्लीन चिट देण्यासाठी नव्हता. सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेना नालेसफाईचे कंत्राटदार नेमत नाही. कंत्राटदार प्रशासन नेमते मग प्रशासन भ्रष्ट आहे का, असा प्रश्न परब यांनी विचारला आहे. प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करत असते. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबल्यास मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी सेनेने केली आहे.
जे. कुमार नागपुरमध्ये कसा चालतो?
आशीष शेलार मुंबई जिंकू शकले नाहीत म्हणून ते शिवसेनेवर विनाकारण आरोप करत आहेत, असा दावा करत नालेसफाई करणारे कंत्राटदार काळ्या यादीत आहेत, हे भाजपला आधी माहिती नव्हते का? जे. कुमार हा कंत्राटदार मुंबई पालिकेत काळ्या यादीत आहे पण तो नागपूर पालिकेत काम करतो आहे. याला जबाबदार कोण, अशी विचारणा परब यांनी केली आहे.