अ‍ॅपशहर

बालमृत्यू रोखण्यासाठी बाल आरोग्य केंद्रे

दुर्गम आदिवासी भागातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी तसेच बिगर आदिवासी जिल्ह्यांत बाल आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून विविध योजना राबवून बालकांना पोषण आहार देण्यात येत आहे,अशी माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली.

Maharashtra Times 14 Mar 2018, 2:53 am
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेत माहिती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम child health centers to prevent child deaths
बालमृत्यू रोखण्यासाठी बाल आरोग्य केंद्रे


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

दुर्गम आदिवासी भागातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी तसेच बिगर आदिवासी जिल्ह्यांत बाल आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून विविध योजना राबवून बालकांना पोषण आहार देण्यात येत आहे,अशी माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली.

पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांसंदर्भात शिवसेनेचे सदस्य रवींद्र फाटक यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. बालमृत्यूसाठी केवळ कुपोषण हे कारण नसून त्यामध्ये अनेक कारणे आहेत. बालमृत्यू होणे ही गंभीर बाब आहे. याबाबत सरकार संवेदनशील आहे. बालमृत्यू कमी करण्यासाठी बाल आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. सर्व अंगणवाडी सेविकांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधन नियमित देण्यात येत आहे, असे एक उपप्रश्नाला उत्तर देताना मुंडे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज