म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
केवळ डाळ-भात खाऊन कुपोषणावर मात करता येत नाही, त्यासाठी संपूर्ण पोषण आहाराची गरज असते. पण जिथे मध्यान्ह आहार योजनेमध्ये डाळभाताशिवाय इतर काही मिळत नाही, तिथे विद्यार्थ्यांना पालेभाज्या कुठून मिळणार, हा प्रश्न विक्रमगडमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांपुढे होताच. पण मुंबईतील संस्था आणि व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे आज या आश्रमशाळांमधील पाचशे विद्यार्थी स्वतः पालेभाज्या पिकवत आहेत. पुढील किमान सात महिने पुरतील इतकी लागवड या विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेच्या परिसरामध्ये केली आहे. कुपोषणावर मात, अनुभवातून शेतीचे शिक्षण, स्वयंपूर्ण होण्याचा ध्यास यानिमित्ताने या विद्यार्थ्यांमध्ये रुजला आहे.
विक्रमगडमधील श्रीमती पार्वतीबाई जसुमल ठाकूर तसेच दि. उल्हासराव भोईर प्राथमिक आश्रमशाळा व माध्यमिक आश्रमशाळेमध्ये सुमारे एक हजार विद्यार्थी शिकतात. विविध संस्थांकडून मिळणाऱ्या मदतनिधीतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्याचा खर्च निघतो. पण पोषण आहारासाठी लागणाऱ्या भाज्या, फळे विकत घेता येत नाहीत. मुंबईतील रोटरी क्लब ऑफ बोरिवली आणि शॉप फॉर चेंज या संस्थांने विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला. या दोन्ही शाळांमध्ये उपलब्ध असणारी जमीन आणि नैसर्गिक स्रोताचा पुरेपूर वापर करून पालेभाज्यांची लागवड कशी करायची याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. रोज दोन तास श्रमदानाच्या माध्यमातून जमिनीमध्ये विद्यार्थ्यांनी भाज्यांची लागवड केली आहे. या शाळांत पुढील सहा महिन्यांसाठी पुरेल एवढी पालेभाज्यांची लागवड करण्यात आली.
आश्रमशाळेचे मुख्याध्यापक यशवंत वातस यांनी हा अनुभव विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांसाठी मोलाचा असल्याचे सांगितले. ते स्वतः याच आश्रमशाळेमध्ये शिकले. हा उपक्रम ऐच्छिक असला तरी स्वतःहून विद्यार्थी यामध्ये पुढाकार घेतात, त्यांना श्रमदानातून आनंद मिळतो. आर्थिक मदतीचा सेतू उभा करण्यासाठी खूप धडपड करावी लागते, हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचीही उमेद वाढली आहे, असे सांगितले. हा शेतीप्रकल्प सुरू करण्यासाठी धडपड करणाऱ्या सचिन आठवल्ये यांनी या उपक्रमाशी जोडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दलचे कुतूहल रुजवण्यासाठी हा प्रयोग निश्चितपणे महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी मातीशी विद्यार्थीदशेमध्ये नाते जुळणे महत्त्वाचे असते. मात्र, त्यासाठी असे प्रयोग करणे गरजेचे असते. शेतकामासाठी लागणारी काही अवजारे, स्रोताची उपलब्धता यासाठी लागणारे अर्थसहाय्य या विद्यार्थ्यांना करण्यात आले.
पुढील आठवड्यामध्ये सेंद्रीय शेतीचा प्रयोग
येत्या आठवड्यामध्ये या दोन्ही आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सेंद्रीय पद्धतीने शेती कशी करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पारंपारिक शेतीसोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये करण्यात येणारे प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांना यामाध्यमातून देण्यात येणार आहे.
केवळ डाळ-भात खाऊन कुपोषणावर मात करता येत नाही, त्यासाठी संपूर्ण पोषण आहाराची गरज असते. पण जिथे मध्यान्ह आहार योजनेमध्ये डाळभाताशिवाय इतर काही मिळत नाही, तिथे विद्यार्थ्यांना पालेभाज्या कुठून मिळणार, हा प्रश्न विक्रमगडमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांपुढे होताच. पण मुंबईतील संस्था आणि व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे आज या आश्रमशाळांमधील पाचशे विद्यार्थी स्वतः पालेभाज्या पिकवत आहेत. पुढील किमान सात महिने पुरतील इतकी लागवड या विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेच्या परिसरामध्ये केली आहे. कुपोषणावर मात, अनुभवातून शेतीचे शिक्षण, स्वयंपूर्ण होण्याचा ध्यास यानिमित्ताने या विद्यार्थ्यांमध्ये रुजला आहे.
विक्रमगडमधील श्रीमती पार्वतीबाई जसुमल ठाकूर तसेच दि. उल्हासराव भोईर प्राथमिक आश्रमशाळा व माध्यमिक आश्रमशाळेमध्ये सुमारे एक हजार विद्यार्थी शिकतात. विविध संस्थांकडून मिळणाऱ्या मदतनिधीतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्याचा खर्च निघतो. पण पोषण आहारासाठी लागणाऱ्या भाज्या, फळे विकत घेता येत नाहीत. मुंबईतील रोटरी क्लब ऑफ बोरिवली आणि शॉप फॉर चेंज या संस्थांने विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला. या दोन्ही शाळांमध्ये उपलब्ध असणारी जमीन आणि नैसर्गिक स्रोताचा पुरेपूर वापर करून पालेभाज्यांची लागवड कशी करायची याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. रोज दोन तास श्रमदानाच्या माध्यमातून जमिनीमध्ये विद्यार्थ्यांनी भाज्यांची लागवड केली आहे. या शाळांत पुढील सहा महिन्यांसाठी पुरेल एवढी पालेभाज्यांची लागवड करण्यात आली.
आश्रमशाळेचे मुख्याध्यापक यशवंत वातस यांनी हा अनुभव विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांसाठी मोलाचा असल्याचे सांगितले. ते स्वतः याच आश्रमशाळेमध्ये शिकले. हा उपक्रम ऐच्छिक असला तरी स्वतःहून विद्यार्थी यामध्ये पुढाकार घेतात, त्यांना श्रमदानातून आनंद मिळतो. आर्थिक मदतीचा सेतू उभा करण्यासाठी खूप धडपड करावी लागते, हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचीही उमेद वाढली आहे, असे सांगितले. हा शेतीप्रकल्प सुरू करण्यासाठी धडपड करणाऱ्या सचिन आठवल्ये यांनी या उपक्रमाशी जोडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दलचे कुतूहल रुजवण्यासाठी हा प्रयोग निश्चितपणे महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी मातीशी विद्यार्थीदशेमध्ये नाते जुळणे महत्त्वाचे असते. मात्र, त्यासाठी असे प्रयोग करणे गरजेचे असते. शेतकामासाठी लागणारी काही अवजारे, स्रोताची उपलब्धता यासाठी लागणारे अर्थसहाय्य या विद्यार्थ्यांना करण्यात आले.
पुढील आठवड्यामध्ये सेंद्रीय शेतीचा प्रयोग
येत्या आठवड्यामध्ये या दोन्ही आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सेंद्रीय पद्धतीने शेती कशी करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पारंपारिक शेतीसोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये करण्यात येणारे प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांना यामाध्यमातून देण्यात येणार आहे.