ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकातील फ्लॅटफॉर्म क्रमांक दहाच्या बाहेरून अपहरण झालेल्या दोन वर्षाच्या बालिकेची पोलिसांनी परभणी येथून सुटका करत दोन सख्ख्या बहिणींसह एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आले आहे. भीक मागण्यासाठी या बालिकेची अपहरण करण्यात आले होते, असे चौकशीत समोर आल्याची माहिती पोलिस सह आयुक्त सुरेश कुमार मेकला यांनी दिली.
पती काम करत नसल्याने यमुना नरवडे (३५) ही महिला प्रेम (५ वर्ष) आणि प्राजक्ता (२ वर्ष) या दोन मुलांसह जालना जिल्ह्यातील पिंळगाव येथून उदरनिर्वाहासाठी ठाण्यात आली होती. २५ सप्टेंबर रोजी सकाळी रेल्वने ठाणे रेल्वे स्थानकात आल्यानंतर हा दिवस रेल्वे स्थानकातच बसून काढला. रात्री जेवण केले आणि स्थानकातील दहा नंबरच्या फ्लॅटफॉर्मबाहेरील मोकळ्या जागेत यमुना मुलांसोबत झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यानंतर मुलगी गायब झाल्याचे लक्षात आले. कोपरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक (गुन्हे) डी. गावडे यांच्या पथकाने तपास चालू केला. सीसीटीव्ही फुटेजमधून मुलीचे अपहरण एक अल्पवयीन मुलगा आणि दोन महिलांनी केल्याचे समोर आले. पोलिसांना आरोपींचा शोध चालू केला. पहाटे आरोपी सानपाडा येथून वाशी लोकलने ठाण्यात आले होते. ५. ३२ मिनिटांनी सानपाडा येथून आरोपींनी ही लोकल पकडली. आणि ५ वाजून ५५ मिनिटांनी लोकल ठाणे स्थानकात आल्याचेही फुटेजच्या माध्यमातून कोपरी पोलिसांच्या हाती महत्वपूर्ण माहिती लागली होती. कुर्ला रेल्वे टर्मिनसला जाऊनही चौकशी केल्यानंतर आरोपींची नावे कोपरी पोलिसांना समजली.
दरम्यान, मध्यवर्ती गुन्हे शोध शाखाही समांतर तपास करत होती. कोपरी पोलिसांकडून गुन्हे शाखेला काही इनपूट मिळाले. आणि कुर्ला रेल्वे टर्मिनस परिसरातील भिकाऱ्यांकडे चौकशी केली. आणि आरोपी परभणीला असल्याचे समोर आले. परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन अनिता भोसले (३०) हिला ताब्यात घेत तिच्या ताब्यातून बालिकेची सुखरूप सुटका केली. तसेच मुलीचे अपहरण करणारी तिची बहीण सिमा पोवार (३५) आणि तिचा ११ वर्षाच्या मुलालाही ताब्यात घेतले. या तिघाही आरोपींना कोपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अनिता हिला मूल नसून ती आणि तिची बहीणही भीक मागण्याचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भीक मागणारी टोळी कार्यरत
भीक मागणारी टोळी असून याबाबत चौकशी चालू आहे, असे पोलिस सह आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी सांगितले. पहिला आमचा उद्देश बालिकेची सुखरूप सुटका करणे होते. मुलीला आईच्या ताब्यात देण्यात आल्याचेही मेकला यांनी दिली.
आईच्या चेहऱ्यावर आनंद
अपहरण झालेली मुलगी परत मिळाल्याने यमुना नरवडे हिच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद ओसांडून वाहत होता. मुलगी परत मिळावी यासाठी मी दररोज पोलिस ठाण्यात जात होती. पती आजारी असल्याने कामासाठी मी ठाण्यात आली होती, असे तिने सांगितले.
पती काम करत नसल्याने यमुना नरवडे (३५) ही महिला प्रेम (५ वर्ष) आणि प्राजक्ता (२ वर्ष) या दोन मुलांसह जालना जिल्ह्यातील पिंळगाव येथून उदरनिर्वाहासाठी ठाण्यात आली होती. २५ सप्टेंबर रोजी सकाळी रेल्वने ठाणे रेल्वे स्थानकात आल्यानंतर हा दिवस रेल्वे स्थानकातच बसून काढला. रात्री जेवण केले आणि स्थानकातील दहा नंबरच्या फ्लॅटफॉर्मबाहेरील मोकळ्या जागेत यमुना मुलांसोबत झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यानंतर मुलगी गायब झाल्याचे लक्षात आले. कोपरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक (गुन्हे) डी. गावडे यांच्या पथकाने तपास चालू केला. सीसीटीव्ही फुटेजमधून मुलीचे अपहरण एक अल्पवयीन मुलगा आणि दोन महिलांनी केल्याचे समोर आले. पोलिसांना आरोपींचा शोध चालू केला. पहाटे आरोपी सानपाडा येथून वाशी लोकलने ठाण्यात आले होते. ५. ३२ मिनिटांनी सानपाडा येथून आरोपींनी ही लोकल पकडली. आणि ५ वाजून ५५ मिनिटांनी लोकल ठाणे स्थानकात आल्याचेही फुटेजच्या माध्यमातून कोपरी पोलिसांच्या हाती महत्वपूर्ण माहिती लागली होती. कुर्ला रेल्वे टर्मिनसला जाऊनही चौकशी केल्यानंतर आरोपींची नावे कोपरी पोलिसांना समजली.
दरम्यान, मध्यवर्ती गुन्हे शोध शाखाही समांतर तपास करत होती. कोपरी पोलिसांकडून गुन्हे शाखेला काही इनपूट मिळाले. आणि कुर्ला रेल्वे टर्मिनस परिसरातील भिकाऱ्यांकडे चौकशी केली. आणि आरोपी परभणीला असल्याचे समोर आले. परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन अनिता भोसले (३०) हिला ताब्यात घेत तिच्या ताब्यातून बालिकेची सुखरूप सुटका केली. तसेच मुलीचे अपहरण करणारी तिची बहीण सिमा पोवार (३५) आणि तिचा ११ वर्षाच्या मुलालाही ताब्यात घेतले. या तिघाही आरोपींना कोपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अनिता हिला मूल नसून ती आणि तिची बहीणही भीक मागण्याचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भीक मागणारी टोळी कार्यरत
भीक मागणारी टोळी असून याबाबत चौकशी चालू आहे, असे पोलिस सह आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी सांगितले. पहिला आमचा उद्देश बालिकेची सुखरूप सुटका करणे होते. मुलीला आईच्या ताब्यात देण्यात आल्याचेही मेकला यांनी दिली.
आईच्या चेहऱ्यावर आनंद
अपहरण झालेली मुलगी परत मिळाल्याने यमुना नरवडे हिच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद ओसांडून वाहत होता. मुलगी परत मिळावी यासाठी मी दररोज पोलिस ठाण्यात जात होती. पती आजारी असल्याने कामासाठी मी ठाण्यात आली होती, असे तिने सांगितले.