म. टा. प्रतिनिधी, मुंबई
आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागवार बैठका मुंबईत सुरू आहेत. रविवारी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराच्या नावाबाबत चर्चा सुरू असताना, प्रदेश कार्यालयाबाहेर परभणी जिल्ह्यातील राजेश विटेकर आणि मधुसूदन केंद्रे या स्थानिक नेत्यांच्या दोन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि शिवीगाळीचा प्रकार घडला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
गेल्या शुक्रवारी विदर्भातील काही जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्यातील जिल्ह्यांचा आढावा रविवारी घेतला. परभणी जिल्ह्याची बैठकीत चर्चा सुरू असतानाच, बॅलार्ड पिअर परिसरातील प्रदेश कार्यालयाबाहेर वादावादी सुरू झाली. त्याचे पर्यवसान धक्काबुक्की व नंतर हाणामारीत झाल्याचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी घटनास्थळी कुमक वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. हा प्रकार प्रदेश कार्यालयाबाहेर सुरू असताना, शरद पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आणि मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत मराठवाड्यात राष्ट्रवादीला अपयशच आले. पण बीड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला चांगले मताधिक्य आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मराठवाड्यातील अधिक जागा राष्ट्रवादी मागण्याची शक्यता आहे.
'हाणामारी नव्हे, तीव्र भावना'
परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा पराभव झाला. त्यांना गंगाखेड मतदारसंघातील विद्यमान आ. मधुसूदन केंद्रे यांच्याकडून मताधिक्य अपेक्षित होते. त्याच ठिकाणी १० हजार मते कमी पडली. केंद्रे यांनी लोकसभेला विटेकर यांचे काम न केल्याचा विटेकर समर्थकांचा आरोप आहे. केंद्रे यांच्या आगामी विधानसभेच्या उमेदवारीला विटेकर समर्थकांचा विरोध आहे. त्यातच माजी आ. सीताराम घनदाट गंगाखेडच्या उमेदवारीस उत्सुक आहेत. दरम्यान, राजकीय चर्चा प्रक्रियेत तीव्र भावना व्यक्त होत असतात. मात्र त्याला आपण राडा किंवा हाणामारी असे म्हणत नाही, असा खुलासा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गोंधळानंतर केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागवार बैठका मुंबईत सुरू आहेत. रविवारी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराच्या नावाबाबत चर्चा सुरू असताना, प्रदेश कार्यालयाबाहेर परभणी जिल्ह्यातील राजेश विटेकर आणि मधुसूदन केंद्रे या स्थानिक नेत्यांच्या दोन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि शिवीगाळीचा प्रकार घडला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
गेल्या शुक्रवारी विदर्भातील काही जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्यातील जिल्ह्यांचा आढावा रविवारी घेतला. परभणी जिल्ह्याची बैठकीत चर्चा सुरू असतानाच, बॅलार्ड पिअर परिसरातील प्रदेश कार्यालयाबाहेर वादावादी सुरू झाली. त्याचे पर्यवसान धक्काबुक्की व नंतर हाणामारीत झाल्याचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी घटनास्थळी कुमक वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. हा प्रकार प्रदेश कार्यालयाबाहेर सुरू असताना, शरद पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आणि मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत मराठवाड्यात राष्ट्रवादीला अपयशच आले. पण बीड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला चांगले मताधिक्य आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मराठवाड्यातील अधिक जागा राष्ट्रवादी मागण्याची शक्यता आहे.
'हाणामारी नव्हे, तीव्र भावना'
परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा पराभव झाला. त्यांना गंगाखेड मतदारसंघातील विद्यमान आ. मधुसूदन केंद्रे यांच्याकडून मताधिक्य अपेक्षित होते. त्याच ठिकाणी १० हजार मते कमी पडली. केंद्रे यांनी लोकसभेला विटेकर यांचे काम न केल्याचा विटेकर समर्थकांचा आरोप आहे. केंद्रे यांच्या आगामी विधानसभेच्या उमेदवारीला विटेकर समर्थकांचा विरोध आहे. त्यातच माजी आ. सीताराम घनदाट गंगाखेडच्या उमेदवारीस उत्सुक आहेत. दरम्यान, राजकीय चर्चा प्रक्रियेत तीव्र भावना व्यक्त होत असतात. मात्र त्याला आपण राडा किंवा हाणामारी असे म्हणत नाही, असा खुलासा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गोंधळानंतर केला आहे.