म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई
हॉटेलमध्ये आणि रस्त्यावरच्या खाऊगल्ल्यांमध्ये खाण्याचे मुंबईकरांचे प्रमाण वाढले आहे. याठिकाणी स्वच्छतेचे निकष अनेकदा पाळले जात नाहीत. अन्नसुरक्षेचे निकष पूर्ण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी अन्न सुरक्षा दिवसानिमित्त काही योजनांची घोषणा केली. राज्यातील चार प्रसिद्ध खाऊगल्ल्यांना अन्न व औषध विभागाचे अधिकारी भेट देऊन अन्न व स्वच्छता सुरक्षेचे निकष पूर्ण करुन या ठिकाणांना उत्तम दर्जाची खाण्यायोग्य ठिकाणांचा दर्जा देण्यात येणार आहेत. देशात पहिल्यांदा या पद्धतीचा प्रयोग राज्यात राबवला जाणार आहे.
मुंबईतील जुहू, गिरगाव चौपाटी, पुण्यातील सारसबाग तसेच नागपूर येथील खाऊगल्ली अशा चार ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर 'क्लिन फूड हब'साठी तपासणी सुरू होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. आज, गुरुवारी अन्नसुरक्षा दिनानिमित्ताने हॉटेल्समधील स्वच्छतेच्या व अन्नसुरक्षेच्या निकषांवर अन्न व औषध प्रशासनाचे निकष पूर्ण केलेल्या तीस हॉटेल्सचा गौरव होणार आहे. यामध्ये मुंबईतील १५, पुण्यातील १० आणि नागपूरातील पाच हॉटेल्सचा समावेश आहे.
क्लिन फूड हब योजनेची माहिती देताना आयुक्त डॉ पल्लवी दराडे म्हणाल्या की, हॉटेल्समध्ये अन्न पदार्थ तयार करताना स्वच्छतेचे निकष पाळणे गरजेचे असते. जी हॉटेल्स हे निकष काटेकोरपणे पाळतील त्यांचा सन्मान करण्यामुळे इतर हॉटेल्सनाही यात प्रोत्साहन मिळेल व मुंबईकरांना सकस अन्नपदार्थ मिळतील.
हॉटेलमध्ये आणि रस्त्यावरच्या खाऊगल्ल्यांमध्ये खाण्याचे मुंबईकरांचे प्रमाण वाढले आहे. याठिकाणी स्वच्छतेचे निकष अनेकदा पाळले जात नाहीत. अन्नसुरक्षेचे निकष पूर्ण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी अन्न सुरक्षा दिवसानिमित्त काही योजनांची घोषणा केली. राज्यातील चार प्रसिद्ध खाऊगल्ल्यांना अन्न व औषध विभागाचे अधिकारी भेट देऊन अन्न व स्वच्छता सुरक्षेचे निकष पूर्ण करुन या ठिकाणांना उत्तम दर्जाची खाण्यायोग्य ठिकाणांचा दर्जा देण्यात येणार आहेत. देशात पहिल्यांदा या पद्धतीचा प्रयोग राज्यात राबवला जाणार आहे.
मुंबईतील जुहू, गिरगाव चौपाटी, पुण्यातील सारसबाग तसेच नागपूर येथील खाऊगल्ली अशा चार ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर 'क्लिन फूड हब'साठी तपासणी सुरू होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. आज, गुरुवारी अन्नसुरक्षा दिनानिमित्ताने हॉटेल्समधील स्वच्छतेच्या व अन्नसुरक्षेच्या निकषांवर अन्न व औषध प्रशासनाचे निकष पूर्ण केलेल्या तीस हॉटेल्सचा गौरव होणार आहे. यामध्ये मुंबईतील १५, पुण्यातील १० आणि नागपूरातील पाच हॉटेल्सचा समावेश आहे.
क्लिन फूड हब योजनेची माहिती देताना आयुक्त डॉ पल्लवी दराडे म्हणाल्या की, हॉटेल्समध्ये अन्न पदार्थ तयार करताना स्वच्छतेचे निकष पाळणे गरजेचे असते. जी हॉटेल्स हे निकष काटेकोरपणे पाळतील त्यांचा सन्मान करण्यामुळे इतर हॉटेल्सनाही यात प्रोत्साहन मिळेल व मुंबईकरांना सकस अन्नपदार्थ मिळतील.